संबंधित विद्यार्थी तांत्रिकदृष्टय़ा नववी आणि अकरावीतच

पुणे :  राज्य मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीचे परीक्षा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली असताना नववी आणि अकरावीतून ‘वर्गोन्नत’ झालेल्या विद्यार्थ्यांचा नवाच प्रश्न समोर आला आहे. ऑनलाइन प्रणालीवर गुण भरल्याशिवाय ‘वर्गोन्नत’ म्हणून नोंद होत नसल्याने संबंधित विद्यार्थी तांत्रिकदृष्टय़ा नववी आणि अकरावीतच असून, या विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा अर्ज भरण्यात अडचणी येऊ शकतात.

ragging case in Pune, pune,
पुण्यातील रॅगिंग प्रकरणाला धक्कादायक वळण! अधिष्ठाताच संशयाच्या भोवऱ्यात
haryana school bus accident
हरियाणातील स्कूलबस अपघात प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; शाळेच्या मुख्यध्यापिकेसह तिघांना अटक
The district administration announced the list of campaign materials along with food items in the list fixed to account for Lok Sabha election expenses pune
जिल्हाधिकाऱ्यांनी पुण्यात आणली ‘स्वस्ताई’; जाणून घ्या कशी?
When will the delayed MPSC exams be held The commission told reason
‘एमपीएससी’च्या लांबलेल्या परीक्षा कधी होणार? आयोगाने सांगितले कारण…

राज्य मंडळातर्फे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने सरल प्रणालीतील माहितीद्वारे भरले जातात. करोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्यावर्षी शासन निर्णयानुसार नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करून निकाल जाहीर करण्यात आला. मात्र शाळेतच न आलेल्या, मूल्यमापनासाठी उपलब्धच न झालेल्या विद्यार्थ्यांना वर्गोन्नती देण्याबाबत शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार संबंधित विद्यार्थी दहावी आणि बारावीच्या वर्गात वर्गोन्नत झाले. मात्र या विद्यार्थ्यांचे स्टुडंट पोर्टलवर गुण भरल्याशिवाय वर्गोन्नत म्हणून नोंद होत नाही. या संदर्भात मुख्याध्यापक महामंडळाने शासनाकडे लेखी निवदेन दिले आहे. मात्र शासनाकडून त्याबाबत मार्गदर्शन देण्यात आलेले नाही.

वर्गोन्नतीची नोंद झालेली नसल्याने संबंधित विद्यार्थी तांत्रिकदृष्टय़ा नववी आणि अकरावीतच आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावीचा परीक्षा अर्ज भरण्यात अडचणी निर्माण होणार आहेत, असे मुख्याध्यापक महामंडळाचे प्रवक्ता महेंद्र गणपुले यांनी सांगितले.

वर्गोन्नत म्हणून नोंद न झालेल्या विद्यार्थ्यांबाबत माध्यमिक शिक्षण संचालकांशी चर्चा केली आहे. या विद्यार्थाच्या तांत्रिक अडचणी सोडवण्यात येतील. या विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावी परीक्षेचा अर्ज भरण्यात अडचणी येणार नाहीत.

शरद गोसावी, अध्यक्ष, राज्य मंडळ