पुणे : राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून दौरे,मेळावे आणि बैठका आयोजित केल्या जात आहे.त्याच दरम्यान ठाकरे गटाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पुणे दौर्यावर आले होत.त्यावेळी पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी अध्यक्ष ब्रीजमोहन पाटील,सरचिटणीस मंगेश फल्ले उपस्थित होते.
तुमचे आजपर्यंत मुंबई महापालिकेकडे सर्वाधिक लक्ष असल्याचे दिसून आले आहे. तर पुणे शहराकडे लक्ष दिसून येत नाहीत्या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसेनेची ताकद आहे.आम्ही आतापर्यंत युती आणि आघाडीचे बळी ठरलो आहोत,त्यावेळेस आम्ही युती मोडून,पुण्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्याबद्दल मी पुणेकरांची माफी मागतो,जर पुणेकरांना पाहिजे असेल तर मी शिवसेनेला पूर्ण ताकदीने काम करायला लावेन,अशी भूमिका त्यांनी मांडली.
रामदास कदम यांनी काय आरोप केला होता?
रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं त्यावेळच्या काही घडामोडींचा उल्लेख करून खळबळ उडवून दिली आहे. ते त्यांच्या भाषणात म्हणाले “माझी एकनाथ शिंदेंना विनंती आहे. शिवसेनाप्रमुखांचं निधन कधी झालं? त्यांचा मृतदेह किती दिवस मातोश्रीवर ठेवला होता? याची माहिती काढा. मी खूप जबाबदारीनं मोठं विधान करत आहे. शिवसेनाप्रमुखांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना आजही विचारून घ्या. दोन दिवस शिवसेना प्रमुखांचा मृतदेह उद्धव ठाकरेंनी का ठेवला होता? अंतर्गत काय चाललं होतं? मी ८ दिवस तिथे खाली मातोश्रीच्या बाकड्यावर झोपलो होतो. सगळं कळत होतं. हे सगळं कशासाठी?” असं रामदास कदम म्हणाले होते. त्यानंतर रामदास कदम यांना संजय राऊत आणि अनिल परब यांनी उत्तर दिलं आहे.
रामदास कदमांच्या आरोपांवर काय म्हणाले उद्धव ठाकरे?
मी गद्दार आणि नमकहरामांना उत्तर देत नाही आणि देण्याची मला गरज नाही. ठाकरे म्हणजे काय आहेत सगळ्यांना माहीत आहेत. पण मी गद्दार आणि हरामखोरांना उत्तर देणार नाही. अशा प्रकारे आरोप झाल्यावर त्रास होतो का? हे विचारलं असता उद्धव ठाकरे म्हणाले, “होय, मला त्रास आणि वेदना नक्कीच होतात. पण शिवाजी पार्कमध्ये हजारो माणसं माझं भाषण थांबवू का विचारल्यावर तुम्ही बोला म्हणतात तेव्हा त्या या वेदनांवर रामबाण उपाय झाला आहे असं मला वाटतं. शिव्या देणाऱ्यांपेक्षा आशीर्वाद देणाऱ्यांचे हात माझ्या पाठिशी आहेत. म्हणून तर मी उभा राहू शकलो आहे.” असं उद्धव ठाकरे म्हणाले.