लोकसत्ता प्रतिनिधी
ठाणे: नितीन कंपनी येथील काट अन घाट या उपाहारगृहाला भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. चार ते पाच तासांपासून या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे कार्य ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून सुरू आहे. ही आग इतकी भीषण आहे की धुराचे लोट परिसरात पसरले आहेत.
नितीन कंपनी येथील सेवा रस्त्याजवळ ठाण्यातील प्रसिद्ध उपाहारगृहांपैकी काठ अन घाट हे उपाहारगृह ओळखले जाते. मंगळवारी पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास या उपाहारगृहात अचानक आग लागली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. या आगीवर नियंत्रण मिळाविण्याचे कार्य पथकाकडून सुरू आहे. आग इतकी भीषण आहे की धुराचे लोट सर्वत्र पसरले आहेत.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.