ठाणे : गर्दीचा प्रवास टाळण्यासाठी तसेच वातानुकूलीत प्रवास करता यावा यासाठी उपनगरीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांनी अतिरिक्त पैसे खर्च करून वातानुकूलीत रेल्वेगाड्यांचे (एसी लोकल) मासिक पास काढले आहेत. परंतु रेल्वेगाड्यांची तांत्रिक देखभाल-दुरुस्तीसाठी सुट्ट्या, रविवारी आणि काही ठराविक दिवसात रेल्वेगाड्यांच्या फेऱ्या वातानुकूलीत रद्द करून त्याऐवजी साध्या रेल्वेगाड्या सोडल्या जात आहेत. वारंवार होणाऱ्या या प्रकारामुळे प्रवाशांकडून समाजमाध्यमांवर नाराजी व्यक्त केली जात आहे. रेल्वेगाड्या वेळेत येत नाहीत. त्यात हा नाहक भूर्दंड सहन करावा लागत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

ठाणे, डोंबिवली, कल्याण, बदलापूर, कर्जत, कसारा अशा विविध भागातून नागरिक उपनगरीय रेल्वेगाड्यांनी मुंबईत कामानिमित्ताने जात असतात. प्रथम दर्जाच्या डब्यांमध्ये देखील गर्दी वाढू लागली आहे. प्रवाशांना गारेगार प्रवास अनुभवता यावा यासाठी २०२२ पासून काही रेल्वेगाड्यांच्या फेऱ्या वातानुकूलीत केल्या आहेत. सुरूवातीला या रेल्वेगाड्यांच्या मासिक पास आणि दैनंदिन तिकीट महागडे असल्याने नागरिकांनी त्यास पसंती दिली नव्हती. परंतु गर्दीचा प्रवास टाळण्यासाठी आता नोकरदार, लघु उद्योजक मोठ्या संख्येने वातानुकूलीत रेल्वेगाड्यांतून प्रवास करताना दिसत आहेत. त्यामुळे या रेल्वेगाड्यांमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या देखील वाढू लागली आहे.

Kalyan, signal malfunction, Central Railway, service disruption, Chhatrapati Shivaji Maharaj Terminus, Kasara, Karjat, local trains, commuter chaos, railway stations, passengers, Dombivli, rain, road traffic, transportation, thane news, marathi news, kalyan news, Central railway news, loksatta news,
कल्याणमध्ये सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने लोकल सेवा विस्कळीत, कामाच्या पहिल्याच दिवशी लोकलचा गोंधळ असल्याने प्रवासी संतप्त
india likely to have 1000 more planes in next five year aviation minister murlidhar mohol
विमानांच्या ताफ्यात पाच वर्षांत हजाराने भर! केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मोहोळ यांची माहिती
Only 35 percent of BEST fleet is self owned Mumbai
बेस्टच्या ताफ्यात स्वमालकीच्या केवळ ३५ टक्के गाड्या
local train passengers, ST buses, mumbai city
मुंबईत रेल्वे प्रवाशांना एसटीचा आधार
pravasi raja din, ST bus, passengers,
एसटी बस प्रवाशांच्या तक्रारी, समस्या ऐकल्या जाणार? काय आहे ‘प्रवासी राजा दिन’ उपक्रम जाणून घ्या…
frequent breakdowns in air-conditioned suburban trains on Western Railway will be controlled
मुंबई : पश्चिम रेल्वेवरील गारेगार प्रवास निर्विघ्न
cctv camera, Thane station,
ठाणे स्थानकातील ३४ कॅमेरे बंद, निगराणी नसल्याने रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
Thane Traffic Chaos, Mumbai Nashik Highway, Thane Traffic Chaos on Mumbai Nashik Highway, Seven Hour Delays, Roadworks and Heavy Vehicle Load, thane news, marathi news
मुंबई-नाशिक महामार्गावरील कोंडीमुळे नागरिक हैराण, ठाणे ते आसनगाव या दोन तासांच्या अंतरासाठी लागताहेत सात तास

हेही वाचा : डोंबिवलीत मोबाईल चोरणारा सुरक्षा अधिकारी अटकेत

परंतु वातानुकूलीत रेल्वेगाड्यांची वाहतुक रविवारी, शासकीय सुट्ट्यांच्या दिवशी तसेच काही ठराविक दिवसांत रद्द करून त्यावेळेत साध्या रेल्वेगाड्या सोडल्या जातात. त्यामुळे वातानुकूलीत रेल्वेगाड्यांचा मासिक पास काढणाऱ्या प्रवाशांना अतिरिक्त पैसे मोजून देखील गर्दीचाच प्रवास करावा लागत आहे. या विषयी प्रवाशांकडून समाजमाध्यमांवर प्रशासनाच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे. काही प्रवासी शारिरिक आजारपणाचा त्रास होणारे प्रवासी देखील सुरक्षित प्रवासासाठी वातानुकूलीत रेल्वेगाड्यांतून प्रवास करतात. परंतु वातानुकूलीत रेल्वेगाड्या रद्द झाल्यास नाइलाजाने नियमित रेल्वेगाड्यांत गर्दीत प्रवास करावा लागत आहे. या रेल्वेगाड्यांच्या फेऱ्या देखील कमी आहेत. त्यामुळे एखादी रेल्वेगाडी वेळेत आली नाही. तर स्थानकात प्रवाशांना रेल्वेगाड्यांची प्रतिक्षा करावी लागत आहे.

हेही वाचा : ठाण्यात दिशादर्शक, नो पार्किंग फलकांची चोरी; वाहतूक पोलिसांची डोकेदुखी वाढली

“आम्ही अतिरिक्त पैसे मोजून वातानुकूलीत रेल्वेगाड्यांचे मासिक पास काढले आहेत. परंतु या रेल्वेगाड्या अनेकदा १५ ते २० मिनीटे उशीराने धावतात. तसेच सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी देखील सेवा रद्द करून त्याऐवजी साध्या उपनगरीय रेल्वेगाड्यांची वाहतुक होते. सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी अनेक कार्यालये सुरू असतात. परंतु वातानुकूलीत रेल्वेगाड्या उपलब्ध होत नाही. त्यामुळे रेल्वेगाड्या प्रवाशांसाठी आहे की, शासकीय कर्मचाऱ्यांसाठी असा प्रश्न पडतो आहे.” – एकनाथ सोनवणे, प्रवासी.

वातानुकूलीत आणि साध्या रेल्वेगाड्यांतील प्रथम दर्जाच्या डब्यांचे मासिक दर (रुपयांत)

ठाणे ते सीएसएमटी – प्रथम दर्जा – ७५५, वातानुकूलीत – १ हजार ७७५
कल्याण ते ठाणे – प्रथम दर्जा – ६६०, वातानुकूलीत -१ हजार ३३५
बदलापूर ते ठाणे – प्रथम दर्जा – ७५५, वातानुकूलीत – १ हजार ७७५
कल्याण ते सीएसएमटी – प्रथम दर्जा- १ हजार १०५, वातानुकूलीत – २ हजार १३५
बदलापूर ते सीएसएमटी- प्रथम दर्जा- १ हजार २८०, वातानुकूलीत – २ हजार ३८५