लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण- मध्य रेल्वेच्या खर्डी आणि उंबरमाळी रेल्वे स्थानकांच्या दरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड झाला आहे. त्यामुळे कसाराकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येणाऱ्या लोकल, लांबपल्ल्याची गाड्यांची वाहतूक ठप्प झाली आहे. मंगळवारी सकाळी ११. २० वाजता मालगाडीच्या इंजिनात बिघाड झाला आहे.

सीएसएमटीकडून कसाराकडे जाणाऱ्या लोकल, एक्सेप्रस वाहतूक सुरळीत आहे, असे रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले. मालगाडीच्या इंजिनमधील बिघाड दुरुस्तीचे काम रेल्वेच्या तंत्रज्ञांनी हाती घेतले आहे. बंद पडलेल्या मालगाडीच्या पाठीमागे कसारा-सीएसएमटी लोकल, भुवनेश्वर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, धुळे-दादर एक्सप्रेस खोळंबून राहिल्या आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले.

आणखी वाचा-कल्याण-शिळफाटा रस्त्यावर उन्नत मार्गाची चाचपणी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आदेशावरून ‘एमएसआरडीसी’कडून अभ्यास

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मागील दोन वर्षापासून खर्डी ते खडवली रेल्वे स्थानकांच्या दरम्यान मालगाडी रुळावरुन घसरणे, याच भागात इंजिनमध्ये बिघाड होण्याचे प्रमाण वाढले आहे. या रेल्वे मार्गाची वरिष्ठांची पाहणी करण्याची मागणी रेल्वे प्रवासी संघटनेकडून केली जात आहे.