भिवंडी येथील काटईगाव भागात भांडणामध्ये तोल जाऊन एकाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री उघडकीस आली आहे. साकीद अन्सारी (२६) असे मृताचे नाव असून याप्रकरणी निजामपूरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा- ब्रम्हाळा तलावाच्या आवारात गर्दुल्ल्यांचा वावर जेष्ठ नागरिक हैराण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काटईगाव येथे एक यंत्रमाग कारखाना आहे. याच कारखान्यावर मजूरांना राहण्यासाठी खोल्या आहेत. या खोलीमध्ये सादीक अन्सारी आणि तुषार सिंह हे राहत होते. बुधवारी रात्री त्यांचे पाणी आणण्याच्या कारणावरून वाद झाले. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. खोली बाहेरील सज्जामध्ये त्यांची हाणामारी सुरू असताना सज्जातून तोल जाऊन सादीक खाली पडला. या घटनेत त्याच्या नाकास, गुप्तांगास आणि हाता पायाला गंभीर दुखापत झाली. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी तुषार सिंह विरोधात निजामपूरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.