Dombivli viral video: मुंब्रा आणि दिवा रेल्वे स्थानकांदरम्यान सीएसएमटी लोकल आणि कसारा लोकल एकमेकांना ओलांडत असताना अत्यंत दुर्देवी घटना घडली. य या घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर, काही जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी आपोआप दरवाजे बंद होणार्‍या नव्या लोकलचा समावेश केला जाईल, असा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईतील सर्वच लोकलचे दरवाजे स्वयंचलित करण्याचा धक्कादायक निर्णय रेल्वे प्रशासन एकीकडे घेत असताना दुसरीकडे मात्र डोंबिवली रेल्वे स्थानकात मंगळवारी सकाळी वातानुकूलित लोकल चे दरवाजे गर्दीमुळे बंद होत नसल्याचा प्रकार उघडकीस आला.

मुंब्रा येथील सोमवारच्या दुर्घटनेनंतर डोंबिवली व अन्य स्थानकावरील प्रवाशांनी मंगळवारी सुरक्षेच्या दृष्टीने दरवाजे बंद असलेल्या एसी लोकलमधून प्रवास करण्याला पसंती दिली. विशेष म्हणजे एसी लोकलमध्ये प्रवाशांची इतकी गर्दी झाली की, तब्बल १० ते १५ मिनिटे एसी लोकलचे दरवाजे बंदच होऊ शकले नाहीत आणि तेवढा वेळ लोकल जागची हलली नाही. डोंबिवली स्थानकात घडलेली ही घटना दरवाजे बंद करण्याच्या बाता मारणाऱ्या मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी ठरली.

पावसाचे दिवस सुरू असले तरी उकाडाही कायम आहे. त्यामुळे बहुतांशी प्रवाशांची पसंती वातानुकूलित लोकलला आहे. नेहमीच्या वेळेत डोंबिवली रेल्वे स्थानकात मंगळवारी सकाळी कल्याण दिशेकडून मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसला जाणारी जलद लोकल आली. प्रवाशांनी नेहमीप्रमाणे लोकल डब्यात चढण्यासाठी गर्दी केली. डबा प्रवाशांनी खचाखच भरून गेल्यावरही अनेक प्रवासी वातानुकूलित डब्यात चढण्यासाठी प्रयत्नशील होते.

पाहा व्हिडीओ

मागील अनेक वर्षांपासून गर्दी कमी करण्यासाठी लोकलच्या फेऱ्या वाढवा, एसी लोकलच्या फेऱ्या वाढवा, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. मात्र, रेल्वेकडून काहीही होत नाही. मुंब्रा येथे सोमवारी प्रवाशांच्या पाठीवरील बॅगेचा धक्का लागून अपघात होऊन प्रवासी मरण पावल्याने पाठीवर मोठ्या सॅक घेऊन प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांनी गर्दीतून धोकादायक प्रवास टाळण्यासाठी मंगळवारी एसी लोकलला पसंती दिली. एसी लोकल दर एक तासाला सोडली जाते. त्यातही एसी लोकल अनेकदा अर्धा तास उशिरा धावत असल्याने प्रवाशांना साध्या लोकलमधून लटकत प्रवास करतात. वाढत्या गर्दीमुळे एसी लोकलचा दरवाजा बंद न होणे, कधी दरवाजा उघडत नसल्याच्या तक्रारी प्रवाशाकडून केल्या जातात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावर व्हिडीओवर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “कामाची वेळ बदलणं, लोकांनी स्वतःलाच शिस्त लावणं,, जास्तीत जास्त गाड्यांची संख्या वाढ करणं हे उपयोगी उपाय असू शकतात. या मागण्या पूर्ण झाल्या तरंच चित्र पालटेल.” तर दुसऱ्या एकानं, “जोपर्यंत मुंबईतील लोकसंख्येवर प्रभावी नियंत्रण ठेवले जात नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने कोणतेही मूलभूत प्रश्न सुटू शकत नाहीत. जर बाहेरून येणाऱ्या लोकांच्या लोंढ्यावर काही प्रमाणात नियंत्रण ठेवले गेले, तर स्थानिक मराठी माणसालाही लोकलमधून सुसज्जपणे प्रवास करण्याची संधी मिळू शकेल. ” असं म्हंटलं आहे. तर आणखी एकानं, “मुंबईकरांनी जगायचं की नाही? किती दिवस किड्या मुंग्यांसारखं आयुष्य जगायचं काय माहिती” अशीही संतापजनक प्रतिक्रिया देत आहे.