Sara Tendulkar Reaction on Shubman Gill Wicket: मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारताने श्रीलंकेचा ३०२ धावांनी पराभव केला. भारताने सलग सातवा सामना जिंकला आणि उपांत्य फेरीत पोहोचणारा पहिला संघ ठरला. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करत ५० षटकात ८ बाद ३५७ धावा केल्या होत्या. यामध्ये सलामीवीर शुबमन गिल (९२), विराट कोहली (८८) आणि श्रेयस अय्यर (८२) धावा काढून बाद झाले. पण या दरम्यान शुभमन गिलच्या विकेटवर सारा तेंडुलकरनं दिलेला रिअॅक्शन सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

विश्वचषक २०२३ चा ३३वा सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात वानखेडे क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. हा सामना पाहण्यासाठी सारा तेंडुलकरनेही हजेरी लावली होती. ३०व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर शुबमन गिल ९२ धावांवर बाद झाला. त्याला दिलशान मधुशंकाने बाद केले. त्याने ९२ चेंडूत ११ चौकार आणि २ षटकार मारले अन् ९२ धावांची अप्रतिम खेळी खेळली, पण त्याचे शतक हुकले. गिलला शतक झळकावण्यात अपयश आलं.

Mehul Prajapati Canada
वर्षाला ८१ लाख रुपये पगार, तरीही मोफत अन्नावर मारायचा ताव; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नोकरी गमावली
Manoj Bajpayee father auditioned at FTII
NSD मध्ये रिजेक्ट झालेल्या अभिनेत्याच्या वडिलांनी FTII मध्ये दिली होती ऑडिशन, धर्मेंद्र अन् मनोज कुमार होते उपस्थित, वाचा किस्सा
IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: धोनीच्या वादळी खेळीने आनंद महिंद्राही झाले चकित, माहीचे कौतुक करताना म्हणाले, “कृतज्ञ आहे की माझं नाव Mahi-ndra…”
98 year old man's reunion with younger brother
सुरकुतलेल्या चेहऱ्यावर उमटलं गोंडस हसू! ९८व्या वर्षी धाकट्या भावाला पुन्हा भेटले आजोबा, पाहा सुंदर Photo

(हे ही वाचा : अफगाणिस्तानचा क्रिकेटर राशिद खानला मिळालेल्या आर्थिक मदतीच्या चर्चेवर रतन टाटांचे स्पष्टीकरण; म्हणाले, “माझा क्रिकेटशी…”  )

वर्ल्डकपमधील शुबमन गिलचं शतक हुकल्याने तमाम भारतीय चाहत्यांची मोठी निराशा झाली. याशिवाय सारा तेंडुलकरही उदास दिसत होती. साराचा चेहरा पडलेला दिसून येत होता. पण क्षणातच सारा उभे राहून गिलच्या खेळीचे कौतुकही करताना दिसून आली. साराची ही प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तथापि, ड्रेसिंग रूममध्ये उपस्थित असलेल्या सदस्यांनी गिलला त्याच्या या शानदार खेळीसाठी उभे राहून दाद दिली, ज्यामध्ये सारा तेंडुलकरचाही समावेश होता.

येथे पाहा व्हिडिओ

भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात केवळ शुभमन गिलचेच शतक हुकले नाही, तर त्याच्याशिवाय विराट कोहली (८८) आणि श्रेयस अय्यर (८२) यांनाही आपली शतके पूर्ण करता आली नाहीत. मात्र, यांच्या शानदार खेळीमुळे भारतानं ५० षटकांत ८ बाद ३५७ धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या श्रीलंकेच्या संघाचा ५५ धावांत भारताने धुव्वा उडवला.