Viral news: हल्लीची मुलं ही फारच स्मार्ट आहेत असं म्हटलं जातं. शाळकरी मुलं त्यांच्या कृतीनं चर्चेचा विषय ठरतात.शालेय जीवनात विद्यार्थी जेवढ्या उचापाती करतात त्या प्रत्येकाच्या कायमच स्मरणात असतातच. पण काही विद्यार्थी हे असेही असतात त्यांच्या एका कृतीने खूपच प्रसिद्ध होऊन जातात. पूर्वीही काही असे विद्यार्थी असतीलच पण त्यांच्या या उचापाती जास्त लोकांच्या समोर आल्या नसतील. पण सध्या सोशल मीडियाच्या जगात अशा कृती लगेचच व्हायरल होतायत. अशाच एका विद्यार्थ्याने लिहिलेला निबंध सध्या जोरदार व्हायरल होतोय. या शाळरी विद्यार्थीनीनं आपल्या बेधुंद जगण्याचा माज उतरवाणारा निबंध लिहला आहे. हा निबंध प्रत्येकालाच विचार कराया भाग पाडत आहे.
आता तुम्ही म्हणाल या शाळकरी मुलानं असं लिहलंय तरी काय ? तर यामध्ये त्यानं, “मला १० कोटी रुपयांची लॉटरी लागली तर…मी शाळेची फी भरली असती. शाळेत लागणाऱ्या वह्या आणि पेन घेतले असते. माझ्या भावाचीही फी भरली असती. शाळेचे कपडे घेतले असते, दादाचेही कपडे घेतले असते. घरात राशन भरलं असते. मित्रांनाही पेन खरेदून दिला असता. आईसाठी नवीन चप्पल वडीलांसाठी कपडे घेतले असते. बाकीचे रुपये आईला जपून ठेवायला सांगितले असते.” असं लिहलं आहे. यावरुन या चिमुकल्याच्या घरची एकंदरीत परिस्थिती लक्षात येते.
माणसाला घडवण्यात, बिघडवण्यात, संकटावर मात करण्यास परिस्थिती शिकवते. म्हणूनच गरिबी वाईट नसते, खरतंर हीच गरीबी आपल्याला लढायला शिकवते, असे म्हणले जाते. जबाबदारी ही वय पाहून येत नाही, पण एकदा आली की खांदे मजबूत करून जाते. या चिमुकल्याची इच्छाशक्ती पाहून सर्वच अवाक् झाले आहेत. या शाळकरी मुलाची विचार करण्याची पद्धत पाहून शिक्षकही शॉक झाले असणार.
पाहा निबंध
सोशल मीडियावर हा निबंध ek_marathi1 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “नक्कीच हा घरातला मोठा आहे.” दुसरा म्हणतो, “ज्या मुलाने लिहिले आहे .त्याचे स्वप्न स्वामी नक्की पूर्ण करतील. खूप मोठा आणि चांगला व्यक्ती होईल तो आयुष्यात.स्वतः कडे आहे त्यातून थोडं दुसऱ्यांना देण्याची वृत्ती आहे त्याच्याकडे आत्तापासून.” तर आणखी एकानं, “त्या १० ओळित प्रत्येक गरीबांची स्वप्न आहेत. ज्याने कोणी लिहिले असेल त्याचे स्वप्न खुप मोठे आहे देव याला पूर्ण करायची ताकत देवो.”