Virat Kohli Marksheet, CBSE Board Result 2025: टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर विराट कोहली याने नुकतीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. विराट कोहलीने लाल चेंडूच्या क्रिकेटमधून निवृत्ती अधिकृतपणे जाहीर केली. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याने आपल्या १४ वर्षांच्या कसोटी कारकिर्दीला अलविदा म्हटलं आहे. त्याच्या या निर्णयाने क्रीडा जगतात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. विराट कोहलीला टीम इंडियाचा कणा मानले जाते. त्याने नेहमीच अनेक कठीण काळातून टीम इंडियाला बाहेर काढले आहे. आता यातच विराट कोहलीची दहावीची मार्कशीट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विराट कोहलीची १०वी इयत्तेची मार्कशीट सध्या समोर येत आहे. विराट कोहलीला दहावीत किती टक्के मिळाले होते, पाहूयात…
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा (CBSE) ने २०२५ चा दहावीचा निकाल नुकताच जाहीर केला आहे. यावेळीही मुलींनी बाजी मारली आहे आणि यावर्षी उत्तीर्ण होण्याचा टक्का ९६.३% होता. दरम्यान, क्रिकेटपटू विराट कोहलीची दहावीची मार्कशीट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विराटची मार्कशीट आयएएस जितिन यादव यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. अशा परिस्थितीत आता लोकांना त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही जाणून घ्यायचे आहे. क्रिकेटपटूच्या रिपोर्ट कार्डसोबत एक खास कॅप्शनदेखील देण्यात आले आहे, ज्यामध्ये त्याच्या संघर्षाची कहाणी दाखवण्यात आली आहे. चला, तुम्हीही पाहा तुमचा आवडता विराट कोहली किती अभ्यासू होता?
विराट कोहली, ज्याने त्याच्या बॅटने शानदार खेळी केली आहे, त्याने निवृत्ती घेतली आहे, ज्याने लाखो लोकांचे मन मोडले आहे. दरम्यान, विराटची दहावीची मार्कशीटही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विराटने इंग्रजी, हिंदी आणि समाजशास्त्र विषयात चांगले गुण मिळवले आहेत. त्याच वेळी त्याला गणित, विज्ञान आणि प्राथमिक आयटीमध्ये कमी गुण मिळाले आहेत. त्याला इंग्रजीमध्ये ८३ गुण, हिंदीमध्ये ७५ गुण, सामाजिक शास्त्रात ८१ गुण, गणितात ५१ गुण आणि आयटीमध्ये ७४ गुण मिळाले आहेत.
जितिन यादव यांनीही विराट कोहलीची मार्कशीट शेअर करताना एक खास नोट लिहिली आहे, जी एक खास संदेश देते. त्यांनी लिहिले, “विराट आज ज्या स्थितीत आहे ते त्याच्या कठोर संघर्षानंतर मिळाले आहे.”
विराटच्या मार्कशीटवर लोकांच्या प्रतिक्रिया
विराट कोहलीची दहावीची मार्कशीट सोशल मीडियावर व्हायरल होताच लोकांनी कमेंट करायला सुरुवात केली. एकाने लिहिले, “कागदावर गुण हे फक्त संख्या आहेत, खरे रत्न म्हणजे कठोर परिश्रम आणि समर्पण आहे.” दुसऱ्याने लिहिले, “शैक्षणिक गुणांना महत्त्व आहे. विराट कोहली, भारतीय क्रिकेट खेळाडू त्याचबरोबर खूप चांगले गुण”, अशा प्रकारच्या अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.