देशभरात सध्या तापमानाचा पारा वाढलेला आहे. कडक्याच्या उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहे. राज्याच्या काही भागात तापमानाचा पारा ४८.८ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे काही दिवसांपूर्वी उन्हामुळे तापलेल्या रस्त्यावर ऑम्लेट करणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यानंतर राजस्थानच्या तळपत्या उन्हात कर्तव्य बजावणाऱ्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानांचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये तापलेल्या वाळूमध्ये पापड भाजून खाताना दिसत होता. दरम्यान आता कडाक्याच्या उन्हामध्ये राजस्थानच्या वाळवंटाच्या बिकानेरजवळील सीमेवर तैनात असलेल्या एका बीएसएफ जवानाचा नवा व्हिडीओ समोर आला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये जवानाने तापलेल्या वाळूमध्ये चक्क अंड भाजून खाल्ले आहे. व्हिडीओ पाहून आश्चर्यकारक प्रात्यक्षिकाने सोशल मीडियाचे लक्ष वेधून घेतले आहे. फक्त सूर्यप्रकाशित वाळूचा वापर करून अंडी उकळणे.

राजस्थान तीव्र उष्णतेची लाट सहन करत आहे, तापमान ४६ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त वाढला आहे आणि ते अधिक वाढण्याची अपेक्षा आहे. अत्यंत तीव्र तापमानामुळे परिस्थितीमुळे रहिवाशांना घरातच राहण्याचा सल्ला दिला जात आहे परंतु बीएसएफचे सैनिक कठोर वातावरणात आपले कर्तव्य बजावत आहेत. एका सैनिकाचा परिस्थितीचा उत्तम सामना करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाने (पीटीआय) शेअर केलेल्या दोन मिनिटांच्या ५९ सेकंदाच्या क्लिपमध्ये सैनिक गरम वाळूमध्ये अंडे पुरताना दाखवले आहे.

हेही वाचा – “हाय गर्मी!”, कडक उन्हात तापलेल्या रस्त्यावर तरुणीने अंड्याचं बनवलं ऑम्लेट, Viral Video पाहून नेटकरी चक्रावले

हेही वाचा – जवानांच्या देशसेवेला कडक सॅल्युट! राजस्थानच्या तळपत्या उन्हातील ‘ती’ परिस्थिती पाहून नेटकरी अवाक्, पाहा video

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही मिनिटांनंतर, तो अंडे बाहेर काढतो, सोलतो आणि ते अंडे पूर्णपणे शिजल्याचे दिसते. वाळूत भाजलेल्या अंडे खाताना जवान दिसत आहे. या व्हिडिओला X वर १०.७ लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिले आहे. हा व्हिडीओ पाहून या प्रदेशातील उन्हाळ्यातील तापमानाची तीव्रता लक्षात येते. राजस्थानातील बिकानेर हे शहर सर्वात उष्ण शहर म्हणून ओखळले जाते. सध्या ४४ अंश सेल्सिअस असलेल्या बिकानेरमध्ये येत्या काही दिवसांत ४८ अंश सेल्सिअसच्या वर तापमान वाढण्याची शक्यता आहे. इतक्या भीषण परिस्थितीमध्ये सीमेवर तैनात सैनिकांच्या देशसेवेला सलाम केला पाहिजे. पण, कडक उन्हातही आपले जवान देशाच्या रक्षणासाठी तत्परतेने कार्य करत आहेत.