भाईंदर : मिरारोड येथे एका प्रियकराने प्रेयसीची चाकूने गळा चिरून हत्या केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. या संदर्भात मिरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी अवघ्या चार तासात अटक केली आहे.
करीना अली (२४) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. ती प्रियकर शमशुद्दीन मोहम्मद कुर्शीद हासिफ (२४) सोबत मिरा रोड येथील म्हाडाच्या गृह संकुलात लिविंग रिलेशनशीप मध्ये राहत होती. मागील काही दिवसापासून या दोघांमध्ये वाद सुरू होता. करीनाचे आपल्या व्यतिरिक्त अन्य काही मुलांशी संबंध असल्याचा संशय शमशुद्दीन मोहम्मद हासिफला होता. दरम्यान गुरुवारी मध्यरात्री करीना कोणाशी तरी फोन वर बोलत असल्याचे पाहताच शमशुद्दीन राग अनावर झाला. आणि त्याने झालेल्या भांडणात करीनाची चाकूने गळा चिरून हत्या केली. त्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढली होती. मात्र घराचा दरवाजा उघडा असल्यामुळे त्यांच्या परिचित लोकांना ही माहिती मिळाली व त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवले. त्यानंतर मिरा रोड पोलिसांनी अवघ्या चार तासात आरोपीला ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी दिली आहे.
शमशुद्दीन हा उच्च शिक्षक तरुण असून मुंबईच्या एका हॉटेलमध्ये शेफ म्हणून कामाला आहे. तर मागील चार दिवसात गळा चिडून हत्या झाल्याची दुसरी घटना मिरा भाईंदर मध्ये घडली आहे. सातत्याने अशा घटना समोर येत असल्याने नागरिकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे.