अरविंद केजरीवाल यांनी जेव्हा आम आदमी पक्षाची (आप) स्थापना केली तेव्हा खूप आनंद झाला होता. देशासाठी ते काहीतरी करतील असं वाटले होते. पण टीम अण्णांत विभाजन झाले आणि त्याची फळं संपूर्ण देशाला भोगावी लागली, अशी खंत व्यक्त करत जर टीम अण्णा आणि इंडिया अग्न्सेटमध्ये फूट पडली नसती तर देशात नक्कीच बदल दिसला असता, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले.