हैदराबाद मुक्तिसंग्रामातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी दत्तराम लक्ष्मण मलदोडे थेरबनकर (वय ८९) यांचे शनिवारी वृद्धापकाळाने निधन झाले. रविवारी थेरबन येथे त्यांच्या पाíथवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.  
निजामसरकारी विरोधी भावना बाळगून हैदराबाद मुक्तिसंग्रामात उघडपणे सहभाग घेणाऱ्या थेरबन येथील दत्ताराम मलदोडे यांनी स्वामी रामानंद तीर्थ, स्वातंत्र्यसेनानी गोिवदभाई श्रॉफ, श्यामराव बोधनकर यांचा विचार अंगीकारून स्वातंत्र्यलढय़ात उडी घेतली. त्यांच्याच विचाराने प्रभावित झालेल्या मलदोडे यांनी मुक्तिसंग्रामात सक्रिय सहभाग नोंदवून निजामांच्या विरोधात लढा दिला. २ वष्रे सक्तमजुरी व २५० रुपये दंडाची शिक्षा ठोठावल्यानंतर ते कारागृहात राहिले. हैदराबाद मुक्तिसंग्रामाच्या लढय़ानंतर विविध गावांचे पुनर्वसन व गायरान जमिनीच्या लढय़ातही त्यांचा सक्रीय सहभाग होता. भोकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष, पंचायत समितीचे तब्बल ११ वष्रे उपसभापती, थेरबनचे १५ वष्रे सरपंच, अशी जबाबदारीही त्यांनी समर्थपणे पार पाडली. राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला होता.  त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, पत्नी, नातू, पणतू असा मोठा परिवार आहे. दत्तराव थेरबनकर यांच्या निधनाचे वृत्त कळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार श्रीनिवास गोरठेकर, जगन शेळके, माजी सभापती गोिवदबाबा गौड, रमेश गोंडलवाड, मारोती कवळे, भगवान दंडवे, सदाशिव कोकुलवार, दत्तात्रय पांचाळ, अब्दुल मजीज यांनी त्यांच्या पाíथवाचे अंत्यदर्शन घेऊन थेरबनकर कुटुंबीयांचे सांत्वन केले. दरम्यान दत्तराव थेरबनकर यांच्या पाíथवावर उद्या (रविवारी) भोकर तालुक्यातील थेरबन येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. पत्रकार रामचंद्र मुसळे यांचे ते आजोबा होत.