श्रीकांत जाधव

आजच्या लेखामध्ये आपण यूपीएससी मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन पेपर तीनमधील आपत्ती आणि आपत्ती व्यवस्थापन या घटकाचा सर्वागीण आढावा घेणार आहोत.

ahmednagar lok sabha election 2024 marathi news
नगरमध्ये पवार-विखे पारंपारिक संघर्ष वेगळ्या वळणावर!
international monetary fund praises india for maintaining fiscal discipline in election year
निवडणूक वर्षातही भारताकडून वित्तीय शिस्त कायम; आंतरराष्ट्रीय़ नाणेनिधीकडून कौतुक; आघाडीच्या देशांमध्ये स्थान कायम राहणार
economic confidence china japan company
जर्मन कंपन्या चीनमधून पुन्हा जपानमध्ये का जात आहेत?
Foreign investors invested more than Rs 2 lakh crore in the domestic capital market
परदेशी गुंतवणूकदारांचे दमदार पुनरागमन; सरलेल्या आर्थिक वर्षात २ लाख कोटींची गुंतवणूक

या घटकावर विचारण्यात आलेले काही प्रश्न

* आपत्ती सज्जता (Disaster preparedness) हे आपत्ती व्यवस्थापन प्रक्रियेतील पहिले पाऊल आहे. स्पष्ट करा की कशा प्रकारे भू-स्खलनाच्या बाबतीत धोकादायक क्षेत्र नकाशा (hazard zonation mapping) साहाय्यकारी ठरू शकते. (२०१९).

* भारतात आपत्ती जोखीम कमी करणे (DRR) यासाठी सेंदाई आपत्ती जोखीम कमी करणे प्रारूप (२०१५-२०३०) (Sendai Framework for DDR-2015-2030) करारावर स्वाक्षरी करण्यापूर्वी आणि केल्यानंतरच्या विविध उपाययोजनांचे वर्णन करा. हे प्रारूप ह्य़ोगो कृती प्रारूप, २००५ (Hyogo Framework for Action, 2005) च्या तुलनेत कशा प्रकारे भिन्न आहे? (२०१८)

* २००४ मध्ये आलेल्या त्सुनामीने भारतासह चौदा देशांमध्ये हाहाकार माजवलेला होता. त्सुनामी घडून येण्यासाठी जबाबदार असणारी कारणे आणि यामुळे जनजीवन व अर्थव्यवस्थेवर पडणाऱ्या  परिणामाची चर्चा करा. ठऊटअ च्या २०१० च्या मार्गदर्शक तत्त्वांच्या संदर्भात अशा प्रकारच्या घटना दरम्यान जोखीम कमी करण्यासाठी तयार असणाऱ्या यंत्रणेचे वर्णन करा. (२०१७).

* अलीकडेच उत्तराखंडमध्ये ढगफुटीच्या अनेक घटना घडल्या, याचा प्रभाव कमी करण्यासाठी अवलंबल्या जाणाऱ्या उपायांची राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या ((NDMA) मार्गदर्शक तत्त्वाच्या संदर्भात, चर्चा करा. (२०१६).

* भारतीय उपखंडामध्ये भूकंपाच्या वारंवारितेत वाढ झालेली दिसून येत आहे. असे असूनसुद्धा त्याचा प्रभाव कमी करण्यासाठीच्या दृष्टीने भारतातील तयारीमध्ये लक्षणीय उणिवा दिसून येतात. विविध पलूंची चर्चा करा. (२०१५).

* दुष्काळाला त्याचा स्थानिक विस्तार (spaital expanse), ऐहिक कालावधी (temporal duration), संथ सुरुवात आणि पीडित वर्गावरील स्थायी स्वरूपातील प्रभाव या दृष्टीने आपत्ती म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) च्या सप्टेंबर २०१० च्या मार्गदर्शक सूचना ध्यानात घेऊन भारतामध्ये एल निनो (El Nino) आणि ला निनो (La Nino) च्या संभाव्य दुष्परिणामांना सामोरे जाण्यासाठीच्या यंत्रणा सज्जतेची चर्चा करा. (२०१४).

* आपत्तीपूर्व व्यवस्थापनेसाठी असुरक्षितता आणि आपत्तीपूर्व व्यवस्थापन जोखीम मूल्यमापन किती महत्त्वाचे आहे? प्रशासक या नात्याने तुम्ही आपत्ती व्यवस्थापन पध्दतीमधील कोणत्या मुख्य क्षेत्रावर लक्ष्य द्याल? (२०१३).

आपत्ती आणि आपत्ती व्यवस्थापन – परीक्षेच्या दृष्टीने आकलन

आधुनिक तंत्रज्ञानामुळे जगभरातील जवळपास सर्व देशांमध्ये विकासात्मक प्रक्रिया अधिक वेगवान बनलेली आहे. पण यामुळे विविध प्रकारच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. उदारणार्थ, अमर्याद जंगलतोड आणि यामुळे होणारा जमिनीचा ऱ्हास, औद्योगिक क्षेत्रामधून उत्सर्जति केले जाणारे हरितगृह वायू, ज्यामुळे झालेली जागतिक तापमानवाढ आणि याचे जागतिक पर्यावरण आणि हवामानावर झालेले दुष्परिणाम, वाढत चालेली लोकसंख्या, औद्योगिक क्षेत्राची वाढ, शहरीकरण इत्यादीमुळे नैसर्गिक साधन संपत्तीचा वेगाने ऱ्हास होत आहे. परिणामी, जगभर विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींमध्ये वाढ होत असलेली दिसून येत आहे.

प्रत्येक वर्षी भारताला विविध प्रकारच्या आपत्तींना सामोरे जावे लागत आहे. वादळे, महापूर, भूकंप, त्सुनामी, दुष्काळ, भूस्खलन, हिमस्खलन, ढगफुटी यामध्ये जागतिक हवामान बदलामुळे उतरोत्तर अधिकच वाढ होत आहे आणि या सोबतच मानवनिर्मित आपत्तींचाही धोका वाढत आहे. आण्विक ऊर्जा केंद्रे, रासायनिक उद्योग यामध्ये होणारे अपघात आणि यामुळे निर्माण होणारी आपत्तीसदृश्य परिस्थिती आणि याचा पर्यावरण आणि मानवी जीवनावर होणारा परिणाम गंभीर स्वरूपाचा असतो. सध्या जगातील जवळपास सर्व देशांमध्ये आपत्ती आणि आपत्ती व्यवस्थापन हा महत्त्वाचा धोरणात्मक भाग बनविण्यात आलेला आहे.

आपत्ती, आपत्ती व्यवस्थापन, आपत्ती पूर्व व्यवस्थापन, आपत्तीचा प्रभाव कमी करण्याच्या उपाययोजना, भूकंप, दुष्काळ व एल निनो (El Nino) आणि ला निनो (La Nino) या  हवामानविषयक संकल्पनांची योग्य माहिती असल्याशिवाय प्रश्नाचा नेमका कल ओळखता येऊ शकत नाही. हा घटक व्यवस्थित समजून घेण्यासाठी पर्यावरण आणि हवामान याविषयाशी संबंधित संकल्पनांची माहिती असणे गरजेचे आहे, हे वरील प्रश्नांवरून दिसून येते.

भारत सरकारनेही आपत्तींना यशस्वीरीत्या हाताळण्यासाठी राष्ट्रीय, राज्यस्तरीय आणि स्थानिक पातळीवर विविध प्रकारच्या सरकारी यंत्रणा कार्यरत केलेल्या आहेत. तसेच याच्या जोडीला कायदेही करण्यात आलेले आहेत, ज्यामुळे देशातील आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षमपणे राबविता येऊ शकते. आपत्ती आणि आपत्ती व्यवस्थापन याविषयी जनजागृती करण्यासाठी सरकारकडून विशेष कार्यक्रमही राबविले जातात.

या घटकावर प्रश्न विचारताना संकल्पनात्मक पलूंचा अधिक विचार केलेला दिसून येतो आणि प्रश्नांचे स्वरूप सामान्यत: विश्लेषणात्मक पद्धतीचे आहे आणि याला चालू घडामोडींची सांगड घालण्यात आलेली आहे. या प्रश्नाची योग्य उकल करण्यासाठी सर्वप्रथम या घटकाची मूलभूत माहिती असणे महत्त्वाचे आहे.

या घटकासाठी नेमके कोणते संदर्भ वापरावेत याची आपण थोडक्यात माहिती घेऊ. या घटकासाठी एन.सी.ई.आर.टी अथवा सी.बी.एस.ई बोर्डाची शालेय पुस्तके सर्वप्रथम वाचावीत ज्याधून या घटकाची मूलभूत माहिती आपणाला मिळते. बाजारात या घटकासाठी अनेक गाइडस स्वरूपात पुस्तके उपलब्ध आहेत, यातील कोणतेही पुस्तक जे सोप्या पद्धतीने या घटकाची माहिती देईल ते वाचावे. उदाहरणार्थ आर. गोपालन लिखित Environmental studies  हे पुस्तक. यामध्ये आपत्ती व्यवस्थापन संबंधित प्रकरण आहे. हा घटक पर्यावरण आणि हवामान याच्याशी मोठय़ा प्रमाणात संबंधित आहे आणि यातील महत्त्वाच्या संकल्पना समजून घेण्यासाठी पी.डी.शर्मा लिखित Ecology and Environment पुस्तक अभ्यासावे. या घटकाचा चालू घडामोडींच्या अनुषंगाने अभ्यास करण्यासाठी ‘द हिंदू’ आणि ‘इंडियन एक्सप्रेस’ ही इंग्रजी दैनिके, योजना, कुरुक्षेत्र, डाऊन टू अर्थ आणि वर्ल्ड फोकस ही मासिके, तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या संकेतस्थळांचा वापर करावा.

या पुढील लेखामध्ये आपण सामान्य अध्ययन पेपर तीनमधील ‘सुरक्षा’ या घटकाची चर्चा करणार आहोत.