सकाळची न्याहारी खूप महत्त्वाची असते – सगळ्यांसाठीच पण जास्त करून ज्येष्ठांसाठी. कारण गेल्या शनिवारी म्हटल्याप्रमाणे संध्याकाळी भूक जास्त मंदावलेली असते, मग त्याची कसर भरून काढण्यासाठी नाश्ता- मस्ट, पण पौष्टिक. काही सोप्या वाटणाऱ्या पण महत्त्वाच्या ‘आहार- त्रिसूत्री.’
१. चहा- बिस्कीट / टोस्ट / फरसाण नाश्ता असू शकत नाही.
२. चहा / कॉफी जास्त उकळलेली (कडक) नसावी. – सवय असेल तर ती मोडावी.
३. सकाळी उठल्यानंतर साधारण दोन-तीन तासांच्या अंतराने नाश्ता करावा. योग्य वेळ आठ ते नऊ दरम्यान. पूजा-पाठ करण्यात वेळ नाही म्हणून दहा-अकरा नंतर नाश्ता करणं पचन-आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही.
काही पौष्टिक नाश्त्याची उदाहरण :
सोमवार- तांदूळ / नाचणीची / ज्वारीची उकड
मंगळवार- सातूची पेज
बुधवार- जिरेसाळ-मेतकूट भात
गुरुवार- लापशीची / अळिवाची खीर
शुक्रवार- राजगिरा लाडू – दूध किंवा राजगिरा लाही – ताक
शनिवार- शाकाहारी उपमा / पोहे
रविवार- धान्य – कडधान्याच्या पिठाची धिरडी
कोणताही नाश्ता घेतला तरी दूध / ताक / दही / मोड आलेले मूग प्रथिनांसाठी बरोबरीने जरूर घ्यावे. एक लक्षात घ्या की नाश्ता योग्य वेळेवर आणि पोटभर घेतला की दिवसभर तरतरी तुम्ही टिकवू शकता.
संग्रहित लेख, दिनांक 11th Jan 2014 रोजी प्रकाशित
न्याहारी
सकाळची न्याहारी खूप महत्त्वाची असते - सगळ्यांसाठीच पण जास्त करून ज्येष्ठांसाठी. कारण गेल्या शनिवारी म्हटल्याप्रमाणे संध्याकाळी भूक जास्त मंदावलेली असते

First published on: 11-01-2014 at 07:01 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Break fast