Rahul Gandhi Maharashtra Assembly Election Match-Fixing Row: भारतीय जनता पार्टीवर तीव्र शब्दांत टीका करत काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी दावा केला की, गेल्या वर्षी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून गैरप्रकार करण्यात आला होता.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालांवरील राहुल गांधी यांच्या आरोपांना केंद्रीय निवडणूक आयोगाने आता प्रत्युत्तर दिले असून, त्यांचे आरोप हस्यास्पद असल्याचे म्हटले आहे. निवडणूक आयोगाने पुढे म्हटले आहे की, राहुल गांधी यांचे आरोप कायद्याचा अपमान करणारे आहेत. दरम्यान राहुल गांधींच्या आरोपांना निवडणूक आयोगाने दिलेले उत्तर निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर सार्वजनिकरित्या उपलब्ध करण्यात आले आहे.

“महाराष्ट्रातील मतदार याद्यांवर उठवले जाणारे निराधार आरोप कायद्याच्या राज्याचा अपमान करणारे आहेत. निवडणूक आयोगाने २४ डिसेंबर २०२४ रोजी काँग्रेसला दिलेल्या उत्तरात ही सर्व तथ्ये समोर आणली होती, जी निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. असे दिसते की, असे मुद्दे वारंवार उपस्थित करताना या सर्व तथ्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे,” असे निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या पत्रात म्हटले आहे.

निवडणूक आयोगाच्या या पत्रात पुढे असेही म्हटले आहे की, “कोणाकडूनही पसरवण्यात येणारी चुकीची माहिती केवळ कायद्याचाच अनादर नाही तर त्यांच्या राजकीय पक्षाने नियुक्त केलेल्या हजारो प्रतिनिधींची बदनामी करणारी आहे. असले प्रकार निवडणुकीदरम्यान अथक आणि पारदर्शकपणे काम करणाऱ्या लाखो निवडणूक कर्मचाऱ्यांना निराश करणारे आहेत. मतदारांच्या कोणत्याही प्रतिकूल निकालानंतर, निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचे आरोप करणे म्हणजे निवडणूक आयोगाची बदनामी करण्याचा प्रयत्न आहे. जो पूर्णपणे हस्स्यास्पद आहे.”

भारतीय जनता पार्टीवर तीव्र शब्दांत टीका करत काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी दावा केला की, गेल्या वर्षी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून गैरप्रकार करण्यात आला होता.

‘मॅच-फिक्सिंग महाराष्ट्र’ या शीर्षकाच्या त्यांच्या इंडियन एक्सप्रेसच्या लेखात, राहुल गांधी यांनी निवडणुकीच्या निकालांमध्ये कथित गैरप्रकार कसा झाला यावर भाष्य केले आहे. याचबरोबर राहुल गांधी यांनी एक्सवर पोस्ट केले की, “२०२४ मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुका लोकशाहीतील गैरप्रकाराची एक ब्लूप्रिंट होती.”

‘मॅच-फिक्सिंग महाराष्ट्र’ या शीर्षकाच्या त्यांच्या इंडियन एक्सप्रेसच्या लेखात, राहुल गांधी यांनी निवडणुकीच्या निकालांमध्ये कथित गैरप्रकार कसा झाला यावर भाष्य केले आहे. याचबरोबर राहुल गांधी यांनी एक्सवर पोस्ट केले की, “२०२४ मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुका लोकशाहीतील गैरप्रकाराची एक ब्लूप्रिंट होती.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे असा दावा केला आहे की, भाजपा या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीतही गैरप्रकार करण्याचा प्रयत्न करत आहे.