दिल्ली दौऱ्यावर असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोनिया गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. महाराष्ट्रात पुढच्या तीन महिन्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी सोनिया गांधींची घेतलेली भेट खूप महत्वपूर्ण आहे. दोन्ही नेत्यांमध्ये कार्य चर्चा झाली ते समजू शकलेले नाही. लोकसभा निवडणुकीच्यावेळीही राज ठाकरेंनी मोदी-शाहंविरोधात जोरदार प्रचार करत अप्रत्यक्षपणे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला साथ दिली होती. त्यावेळी मनसेने लोकसभेची निवडणूक लढवली नव्हती.

https://twitter.com/ANI/status/1148222524964184064

राज ठाकरेंच्या सभा भरपूर गाजल्या होत्या. जाहीर सभांमधून त्यांनी मोदींच्या भाषणाचे जुने व्हिडिओ आणि प्रत्यक्ष परिस्थिती यामधली तफावत दाखवून दिली होती. राज ठाकरेंच्या सभांची चर्चा भरपूर झाली. पण प्रत्यक्षात मतदारांवर त्याचा फारसा परिणाम झाला नाही. त्यावेळी मनसे लोकसभेला काँग्रेस-राष्ट्रवादीला मदत करेल मोबदल्यात दोन्ही पक्ष त्यांना विधानसभेला साथ देतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती.

त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी सोनिया गांधींची घेतलेली भेट महत्वपूर्ण आहे. राज ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीमध्ये सहभागी होणार की स्वतंत्रपणे निवडणुकांना सामोरे जाणार ते लवकरच स्पष्ट होईल.

सोनिया गांधींच्या भेटीला जाण्याआधी राज ठाकरेंनी सकाळी निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. ईव्हीएमध्ये मोठा घोळ झाला आहे, जे जिंकले आहेत त्यांना जिंकून कसे आलो याबाबत शंका आहे. मतदाराना त्यांनी कुणाला मतदान केलं ते समजलं पाहिजे. मी त्याच संदर्भात निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. निवडणूक आयोगाकडून मला शून्य अपेक्षा आहे. कारण त्यांच्याशी बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर जे काही हावभाव होते त्यावरूनच हे लक्षात येत होतं की त्यांना आमच्या बोलण्यात काहीही स्वारस्य नाही असंही राज ठाकरेंनी म्हटलं.

मी बॅलेट पेपरची मागणी केली आहे. मी औपचारिकता म्हणूनच भेट घेतली आहे असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. मॅच फिक्स असेल तर तयारी करण्याला काय अर्थ आहे असंही राज ठाकरेंनी विचारलं आहे. तसंच ईव्हीएमची चीप अमेरिकेहून येत असेल तर हॅकिंगची शक्यता आहेच असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.