मुंबईत ‘कोसळ’धार, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी लोकल्सचा वेग मंदावला
मुंबईत आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. यामुळे रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे. पश्चिम रेल्वे मार्ग, मध्य रेल्वे मार्ग आणि हार्बर रेल्वे मार्ग अशा तिन्ही मार्गांवरची लोकल वाहतूक १५ ते २० मिनिटे उशिराने सुरू आहे.

मुंबईतल्या अनेक सखल भागांमध्ये पाणी साठण्यास सुरूवात झाली आहे. रविवारी दुपारी काहीशी विश्रांती घेतलेल्या पावसाने रात्रीपासून दमदार बॅटिंग सुरू केली आहे. त्याचा परिणाम मुंबईच्या लोकल वाहतुकीवर झाला आहे. वाचा सविस्तर…
..तर उद्धव ठाकरेंना शिवाजी महाराजांनी टकमक टोकावरून खाली फेकले असते-नीलेश राणे
मराठा आंदोलकांनी आरक्षण वैध ठरल्याच्या निर्णयानंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यांचे आभार मानले. त्यावेळी मराठा-मराठेतर वाद विसरा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून एकत्र या असे आवाहन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी केले. ज्यावर आता नीलेश राणे यांनी ट्विटच्या माध्यमातून टीका केली आहे. निवडणुका जवळ आल्या असल्याने उद्धव ठाकरेंनी असे वक्तव्य केले. वाचा सविस्तर…
लोणावळा-कर्जत दरम्यान मालगाडीचे डबे घसरले, इंद्रायणी, डेक्कन एक्स्प्रेस रद्द
मुंबई पुणे रेल्वे मार्गावर मालगाडीचे डबे घसरल्याची घटना आज पहाटे साडेचारच्या सुमारास घडली. यानंतर पुण्याच्या दिशेने जाणारी रेल्वे वाहतूक बंद झाली आहे. पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुंबई पुणे रेल्वे मार्ग विस्कळीत झाला आहे. जामरुंग रेल्वे स्थानकाजवळ आज पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. आता या ठिकाणी हे डबे हटवण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे. मात्र या घटनेमुळे पुण्याकडे जाणारी रेल्वे वाहतूक बंद झाली आहे. वाचा सविस्तर…
World Cup 2019 Ind vs Eng : इंग्लंड विजयी, भारताच्या पराभवाने पाकची धाकधूक वाढली
लियाम प्लंकेट आणि ख्रिस वोक्स यांनी टिच्चून मारा करत विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडला विजयपथावर आणलं आहे. ३३८ धावांचा पाठलाग करताना भारताचा संघ ३०६ धावांपर्यंतच मजल मारु शकला. इंग्लंडने ३१ धावांनी सामन्यात बाजी मारत, उपांत्य फेरीसाठी आपलं आव्हान जिवंत ठेवलं आहे. इंग्लंडचा साखळी फेरीत आता न्यूझीलंडशी सामना होणं बाकी आहे. मात्र भारताच्या पराभवामुळे पाकिस्तानच्या गोटात चिंतेच वातावरण पसरलं आहे. उपांत्य फेरीत दाखल होण्यासाठी पाकिस्तानला बांगलादेशविरुद्ध विजयासोबत इतर संघाच्या कामगिरीवरही अवलंबून रहावं लागणार आहे. वाचा सविस्तर…
झायराच्या बॉलिवूड सोडण्याच्या निर्णयावर ओमर अब्दुल्ला म्हणतात..

‘दंगल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री झायरा वसीम हिने कलाविश्व सोडण्याचा निर्णय घेतला आहे. झायराने सोशल मीडियावर रविवारी एक भलीमोठी पोस्ट लिहिली आहे. ‘कलाविश्वात जरी माझी प्रगती होत असली, जरी मी इथे योग्य वाटत असले तरी मी खूश नाही. हे क्षेत्र मला माझ्या ईमानपासून दूर खेचत आहे. मी अल्लाहच्या रस्त्यापासून भरकटले होते,’ असं तिने म्हटलं. तिच्या या निर्णयामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. तर काहींनी तिला ट्रोलसुद्धा केलं आहे. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी झायराला पाठिंबा दिला आहे. वाचा सविस्तर…