हिंदुंच्या भावना गायीशी जोडलेल्या असल्यामुळे लोकांनी गोमांस खाऊ नये, असे आवाहन केंद्रीय सामाजिक कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. त्यांचे हे वक्तव्य काही दिवसांपूर्वी त्यांनीच केलेल्या वक्तव्याच्या एकदम विरूद्ध आहे. गोमांस खाण्यापासून कोणी कोणाला रोखू शकत नाही. प्रत्येकाला त्याच्या आवडीचे मांस खाण्याचा अधिकार आहे, असे त्यांनी म्हटले होते. आठवले यांनी आपल्या पूर्वीच्या वक्तव्यापासून फारकत घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

गुजरात येथील राजकोट येथे शनिवारी झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. लोकांनी गायीचे मांस खाऊ नये. देशात गोहत्येविरोधात कायदा आहे. हिंदूंच्या भावना गायीशी जोडलेल्या आहेत, असे म्हणत लोकांनी दुसऱ्या जनावराचे मांस खाण्यात कोणतीच अडचण नसल्याचे ते म्हणाले. त्याचबरोबर गोरक्षणाच्या नावाखाली लोकांना मारहाण करणे, त्यांची हत्या करणे सध्या फॅशन बनली असल्याचा आरोप त्यांनी केला.

INDIA parties project unity at rally in Ranchi
आघाडीत राहिल्यामुळेच सोरेन तुरुंगात; ‘इंडिया’च्या सभेत खरगे यांचा आरोप
Sexual abuse of young woman by pretending treatment case filed against self-proclaimed doctor in Nalasopara
उपचाराच्या नावाखाली तरुणीवर लैंगिक अत्याचार, नालासोपार्‍यात स्वयंघोषित वैद्याविरोधात गुन्हा दाखल
in Pune Unborn Child Dies as Pregnant Woman Beaten by a neighbor One Arrested
पुणे : शेजाऱ्याने केलेल्या मारहाणीत गर्भवती महिलेच्या पोटातील अर्भकाचा मृत्यू
Pune, Woman, Commits Suicide, Over Property Dispute, Case Registered, Brother, Relatives, police, crime news, marathi news,
पुणे : संपत्तीच्या वादातून महिलेची गळफास घेऊन आत्महत्या; सख्या भावासह नातेवाईकांविरुद्ध गुन्हा

आठवले यांनी यापूर्वी गोमांस खाण्याचा सर्वांना अधिकार असल्याचे म्हटले होते. गोरक्षणाच्या नावाखाली भक्षक बनणे योग्य नाही. प्रत्येकाला पोलिसांत जाण्याचा अधिकार आहे. पण कायदा मोडण्याचा अधिकार नाही. अशा लोकांना शिक्षा झालीच पाहिजे, असे त्यांनी काही दिवसांपूर्वीच म्हटले होते.

परंतु, शनिवारी त्यांचे वक्तव्य आपल्या पूर्वीच्या वक्तव्यापेक्षा अगदी उलट आहे. रामदास आठवले यांच्या रिपाइं पक्षाचा भाजपला पाठिंबा आहे. भाजपचा गोहत्येला विरोध आहे. याचदरम्यान आठवलेंनी याविरोधात वक्तव्य केल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. कदाचित भाजपमध्ये आपल्या वक्तव्यामुळे निर्माण झालेली नाराजी दूर करण्याचा प्रयत्न आठवले यांनी केल्याचे बोलले जाते.

दरम्यान, शनिवारी त्यांनी गायीच्या नावावर काही लोक देशाची एकता आणि अखंडता भंग करण्याचा प्रयत्न करत असून कोणत्याही व्यक्तीला कायदा हातात घेण्याच अधिकार नसल्याचे म्हटले.