भारतात मोबाइल वापरकर्त्यांची संख्या खूप जास्त आहे. यासाठी अनेक मोबाइल रिचार्ज कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे प्लान लाँच करीत असतात. एअरटेल, जिओ आणि व्हीआय यांसारख्या कंपन्या प्रीपेड आणि पोस्टपेडसाठी अनेक रिचार्ज प्लॅन देत असतात. ग्राहक कंपनीच्या सिमकार्डप्रमाणे आपला रिजार्च प्लॅन निवडतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, या सर्व मोबाइल रिचार्ज कंपन्यांच्या प्लॅन्सची वैधता केवळ २८ दिवसांसाठी का असते? अनेकांना याचे उत्तर माहीत नसेल, त्यामुळे आम्ही तुम्हाला रिचार्जच्या महिन्याभराच्या प्लॅनची वैधता २८ दिवसांची का असते याचे खरे कारण सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊ-

इंटरनेट प्लॅन्स फक्त २८, ५६ किंवा ८४ दिवसांसाठी का असतात?

भारतातील अनेक मोबाइल रिचार्ज कंपन्यांकडून २८ दिवसांचा इंटरनेट प्लॅन दिला जातो. यापूर्वी केवळ काही कंपन्यांकडून २८ दिवसांचा प्लॅन दिला जात होता. पण आता सर्वच कंपन्यांनी आपल्या रिचार्ज प्लॅनची वैधता २८ दिवसांची केली आहे. या प्रकारच्या प्लॅनमुळे ग्राहकांना एका वर्षात १२ रिचार्ज प्लॅनऐवजी १३ रिचार्ज प्लॅन करावे लागतात. २८ दिवसांच्या प्लॅनमुळे ३० दिवसांच्या महिन्यात २ दिवस वाचतात आणि जर ३१ दिवसांचा महिना असेल तर ३ दिवस शिल्लक राहतात. याचा आर्थिक फायदा रिचार्ज कंपन्यांना होतो.

जर फेब्रुवारी महिना २८/२९ दिवसांचा असला तरी, संपूर्ण वर्षात २८/२९ दिवस अतिरिक्त असतात, त्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा रिचार्ज करावा लागतो. अशा प्रकारे कंपन्यांना दरवर्षी जास्तीत जास्त एका महिन्याच्या रिचार्जचा लाभ मिळतो. मात्र बीएसएनएलकडून अद्यापही ३० दिवसांचा प्लॅन दिला जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२८ दिवसांच्या प्लॅनबाबत ट्रायची भूमिका काय आहे?

काही काळापूर्वी असे समोर आले होते की, ट्रायद्वारे अनेक टेलिकॉम कंपन्यांना २८ दिवसांऐवजी ३० दिवसांचा प्लॅन देण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करणार आहेत. मात्र अद्यापपर्यंत ट्रायने अशी कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे जारी केलेली नाहीत, त्यामुळे सर्व कंपन्यांचे मोबाइल रिचार्ज प्लॅन पूर्वीप्रमाणेच सुरू आहेत.