पहिल्या दोन कसोटी सामन्यांप्रमाणे इंदोरच्या होळकर स्टेडियवर देखील परिस्थिती फिरकी गोलंदाजीसाठी अनुकूल पाहायला मिळाली. परिणामी बुधवारी (१ मार्च) सुरू झालेल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात भारतीय संघ स्वस्तात गुंडाळला गेला. ऑस्ट्रेलियन संघा देखील दुसऱ्या डावात मोठी धावसंख्या उभी करू शकला नाही. पण पाहुण्या संघाने भारतावर ८८ धावांची आघाडी घेतली. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात रवींद्र जडेजा त्याच्या नो बॉल आणि डीआरएसमुळे खूप गाजला. त्यावर रोहित शर्माची मजेशीर प्रतिक्रिया व्हायरल होत आहे.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करणारा भारतीय संघ ३३.२ षटकात अवघ्या १०९ धावांवर गारद झाला. त्याचवेळी फलंदाजीसाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाचे वर्चस्व या सामन्यात स्पष्टपणे दिसून येत आहे. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीदरम्यान रोहित शर्माने असे काही केले जे सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहे. भारतीय कर्णधाराने स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाला शिवीगाळ केली. त्याचा शिवीगाळ करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ते म्हणत आहेत “जड्डू बस** देख कहाँ रहा है बॉल रहा रहा है.” ऑस्ट्रेलियाची धावसंख्या ११ षटकांत १ गडी गमावून ३९ धावा असताना ही घटना पाहायला मिळाली. ११व्या षटकात जद्दूचा एक चेंडू लेग स्टंपवर पडला आणि ख्वाजाच्या पॅडला लागला.

जडेजा आणि यष्टिरक्षक श्रीकर भरत यांच्याशी बोलताना रोहितने डीआरएस घेतला. तथापि, त्याचे पुनरावलोकन व्यर्थ गेले कारण रिप्लेमध्ये चेंडू लेग स्टंपच्या बाहेर असल्याचे दिसून आले. भारताचा हा आढावा गेला. डावाच्या सहाव्या षटकात रवींद्र जडेजाने घेतलेला रिव्ह्यू भारताने आधीच चुकवला होता. यामुळे रोहितने त्याला शिवीगाळ केली. व्हिडिओमध्ये रोहित शर्मा अजिबात रागात दिसत नव्हता. त्याच वेळी, चाहते या व्हिडिओचा खूप आनंद घेत आहेत आणि मजेदार कमेंट्स करत आहेत.

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघ फलंदाजी करत होता. डावाची सुरुवात ४ बाद १५६ धावांवर झाली. दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात ऑस्ट्रेलिया संघ १९७ धावांवर असताना भारतीय संघाने त्यांची शेवटची विकेट घेतली. सलामीवीर उस्मान ख्वाजा याने ऑस्ट्रेलियन संघासाठी या डावात सर्वाधिक ६० धावा केल्या. भारतासाठी फिरकीपटू रविंद्र जडेजा पुन्हा एकदा चमकदाल. जडेजाने ४ तर रविचंद्रन अश्विनन आणि उमेश यादव यांनी प्रत्येकी ३-३ विकेट्स नावावर केल्या.

हेही वाचा: Team India: भारताचा स्टार गोलंदाज उपचारांसाठी न्यूझीलंडला होणार रवाना! बुमराहच्या फिटनेस बाबतीत BCCI घेणार मोठा निर्णय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतीय संघाकडून माजी कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ५२ चेंडूत २ चौकारांच्या मदतीने २२ धावा केल्या. त्याचवेळी केएल राहुलच्या जागी खेळणारा शुबमन गिल या सामन्यात सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला. त्याने १८ चेंडूत ३ चौकारांच्या मदतीने २१ धावा केल्या. दुसरीकडे ऑस्ट्रेलिया संघाच्या गोलंदाजीबद्दल बोलायचे तर मॅथ्यू कुहनमनने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने ५ फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यांच्याशिवाय अनुभवी फिरकी गोलंदाज नॅथन लायनने ३ तर टॉड मर्फीने एका फलंदाजाला आपला बळी बनवले.