भारतीय कसोटी संघाची दुसरी भिंत म्हटल्या जाणाऱ्या चेतेश्वर पुजाराने एक मोठा विक्रम केला आहे. बांगलादेशविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीत एक मोठा टप्पा गाठला आहे. त्याने क्रिकेटच्या सर्वात लांब फॉरमॅटमध्ये ७००० धावांचा टप्पा ओलांडला आहे. पुजारा अशी कामगिरी करणारा भारतातील ८वा आणि जगातील ५५वा खेळाडू ठरला आहे.

पुजाराने सर डॉन ब्रॅडमन यांना मागे टाकले –

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत पुजाराने सर डॉन ब्रॅडमन यांना मागे टाकले आहे. ब्रॅडमन यांनी ५२ कसोटी सामन्यांमध्ये ९९.९४ च्या अविश्वसनीय सरासरीने ६९९६ धावा केल्या होत्या. बांगलादेशविरुद्ध ९८वी कसोटी खेळत असलेल्या पुजाराने ४४.८८ च्या प्रभावी सरासरीने ७००० धावांचा टप्पा पार केला आहे. यादरम्यान त्याच्या बॅटमधून १९ शतके आणि ३४ अर्धशतके झळकली आहेत.

सर्वाधिक कसोटी धावा –

भारताकडून सर्वाधिक कसोटी धावा सचिन तेंडुलकरच्या नावावर आहेत, ज्याने १५९२१ कसोटी धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रमही सचिनच्या नावावर आहे. टीम इंडियाचा सध्याचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड १३२६५ धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

हेही वाचा – IPL 2023 Auction: आज खेळाडूंचा लिलाव; जाणून घ्या मिनी लिलावापूर्वी सर्व प्रश्नांची उत्तरे

तिसऱ्या क्रमांकावर माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर आहेत, ज्यांनी १०१२२ धावा केल्या आहेत. त्यानंतर व्हीव्हीएस लक्ष्मणने ८७८१ कसोटी धावा केल्या आहेत. या यादीत वीरेंद्र सेहवाग ८५०३ धावांसह पाचव्या स्थानावर आहे, तर ८०९४ कसोटी धावा करणाऱ्या सेहवागनंतर विराट कोहलीचा क्रमांक येतो. यानंतर माजी कर्णधार सौरव गांगुली ७२१२ धावांसह सातव्या क्रमांकावर आहे. या यादीत विराट हा एकमेव फलंदाज आहे जो अजूनही क्रिकेट खेळत आहे, बाकी सर्व खेळाडूंनी निवृत्ती घेतली आहे.

हेही वाचा – IPL Mini Auction 2023: लिलावापूर्वी ‘या’ स्टार खेळाडूचा आश्चर्यकारक निर्णय; सोळाव्या हंगामाच्या लिलावातून घेतली माघार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारताने बांगलादेशला पहिल्या दिवशी २२७ धावांत गुंडाळले. दुसऱ्या दिवशी, वृत्त लिहिपर्यंत भारताने २ विकेट गमावून ६० धावा केल्या आहेत. विराट कोहली चेतेश्वर पुजारासोबत खेळपट्टीवर आहे. केएल राहुल १० आणि शुबमन गिल २० धावा करुन तंबूत परतले आहेत.