India vs New Zealand 1st T20: भारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यानच्या तीन सामन्यांच्या टी२० मालिकेला शुक्रवारी (२७ जानेवारी) सुरुवात झाली. मालिकेतील हा पहिला सामना रांची येथील जेएससीए स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारतीय कर्णधार हार्दिक पांड्या याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारत-न्यूझीलंड यांच्यातील तीन टी२० सामन्याच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात रणजी ट्रॉफीमध्ये त्रिशतक मारणाऱ्या पृथ्वी शॉ ला अंतिम अकरामध्ये स्थान न मिळाले नाही.

मर्यादित षटकांची एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघ आता हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० मालिकेत कमाल दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. पण, यावेळी अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत टीम इंडियाला किवींचा सामना करायचा आहे. त्यामुळे यजमानांसाठी हे आव्हान सोपं नक्की नसेल. २००७ मध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला टी२० सामना खेळला गेला होता. तेव्हापासून या दोघांमध्ये २२ सामने खेळले गेले. त्यापैकी १२ सामने भारताने जिंकले आहेत. तर न्यूझीलंडला ९ सामने जिंकण्यात यश आले. या २२ पैकी केवळ एक सामना अनिर्णित राहिला.

सामन्याआधी पृथ्वी शॉ चा व्हिडिओ व्हायरल

पृथ्वी शॉ ने एक व्हिडिओ संदेश प्रसारित केला आहे, त्यांनी की टीम इंडियामध्ये सेलेक्शन केल्यावर त्यांचे फॅमिली, मित्र आणि जवळचे नातेसंबंध आनंदी आहेत. टीम इंडिया सेलेक्शन केल्यावर पृथ्वी शॉ के पास तो फोन आणि ईमेल आला की हा मोबाईलच होता. युवा सलामीवीर पृथ्वी शॉचा हा व्हिडिओ संदेश बीसीसीआयने शेअर केला आहे. यामध्ये हा युवा सलामीवीर म्हणाला, “टीम इंडियात निवड झाल्यानंतर माझे वडील आणि इतर सर्वजण खूप आनंदी होते. बऱ्याच दिवसांनी माझी टीम इंडियात निवड झाली. यासाठी मी खूप मेहनत घेतली आहे. रात्री १०.३० च्या सुमारास टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. त्यावेळी झोपली होती.”

पृथ्वी शॉ पुढे म्हणाला, “माझा मोबाइल सायलेंट होता. मधेच मला जाग आली तेव्हा दिसले की बरेच फोन आणि मेसेज आले होते. त्यामुळे माझा मोबाईल हँग झाला. मला समजले नाही आणि काय झाले म्हणून मी घाबरलो. त्यानंतर मला कळले की माझी टी२० मालिकेसाठी टीम इंडियामध्ये निवड झाली आहे. माझे वडील आणि जवळचे मित्र मला म्हणाले.”

हेही वाचा: MS Dhoni First Film: Lets Get Married महेद्रसिंग धोनीची नवी इनिग सुरु, क्रिकेटच्या पिचवरून थेट चित्रपटाच्या स्क्रीनवर

रणजी सामन्यात खेळल्या गेलेल्या ३७९ धावांची इनिंग

पृथ्वी शॉने जुलै २०२१ पासून भारतीय संघासाठी एकही सामना खेळलेला नाही. अलीकडेच त्याने रणजी ट्रॉफीमध्ये महाराष्ट्राकडून खेळताना आसामविरुद्धच्या सामन्यात ३८३ चेंडूत ३७९ धावांची खेळी केली होती. पृथ्वी शॉने या खेळीत ४ षटकार आणि ४९ चौकार लगावले. त्याचा स्ट्राईक रेटही ९८.९६ होता. या खेळीनंतरच पृथ्वी शॉ सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आला. या खेळीच्या जोरावर पृथ्वी शॉला टीम इंडियात स्थान मिळाले.

भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन

शुबमन गिल, इशान किशन, राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, शिवम मावी, उमरान मलिक, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव

हेही वाचा: BCCI on Sarfaraz Khan: “सगळ्यांनाच आम्ही नाही घेऊ शकत पण…”, बोर्डाच्या निवड समितीने तोडले मौन; सरफराज खानला दिलासा

न्यूझीलंड संघाची प्लेइंग इलेव्हन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फिन ऍलन, डेवॉन कॉनवे (यष्टीरक्षक), मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर (कर्णधार), लॉकी फर्ग्युसन, ईश सोधी, ब्लेअर टिकनर, जेकब डफी