भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी२० सामना आज पुण्यात खेळवला जाणार आहे. पहिल्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा दोन धावांनी पराभव केला होता. अशा परिस्थितीत हा सामना जिंकून मालिकेवर कब्जा करण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. हार्दिक पांड्याने आयर्लंड आणि न्यूझीलंड दौऱ्यावर त्याच्या नेतृत्वाखाली भारतासाठी टी२० मालिका जिंकली आहे, त्यामुळे त्याला प्रथमच घरच्या मैदानावर भारतासाठी मालिका जिंकण्याची इच्छा आहे.

दुसऱ्या टी२० सामन्यापूर्वी इरफान पठाणने टीम इंडियाच्या फलंदाजांना खास सल्ला दिला आहे. भारताच्या फलंदाजीच्या मानसिकतेबद्दल बोलताना टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण म्हणाला की, “वेडेपणाची पद्धत असली पाहिजे.” इरफान पठाणने भारतीय संघाला गुच्छांमध्ये विकेट गमावू नका असा सल्ला दिला. विशेष म्हणजे पहिल्या टी२० सामन्यात भारताने गटात विकेट गमावल्या.

फलंदाजांनी लवकर विकेट गमावणे टाळावे: इरफान

इरफान पठाणने स्टार स्पोर्ट्सला सांगितले की, “वेडेपणाची पद्धत असली पाहिजे. युक्ती गुच्छांमध्ये आपली विकेट गमावू नका. जेव्हा तुम्ही गुच्छांमध्ये विकेट गमावता तेव्हा एक समस्या उद्भवते. भारतीय फलंदाजांनी दोन किंवा तीन विकेट झटपट गमावल्यास, त्यांच्यात डावाला गती देण्याची आणि भागीदारी उभारण्याची क्षमता असायला हवी”, असे इरफानचे मत आहे. पठाण म्हणाला, ‘तुम्हाला आक्रमक दृष्टिकोन बाळगण्याची गरज आहे. पण जेव्हा तुम्हाला असे वाटते की तुम्ही दोन किंवा तीन विकेट गमावल्या आहेत, तेव्हा तुम्हाला तिथे भागीदारीची गरज आहे.

हेही वाचा: IND vs SL 2nd T20: शुबमनचा पॉवर प्लेमधील बदलेला पवित्रा…तर चहलचा परतलेला फॉर्म गाजवणार का पुण्याचे मैदान?

शॉटची निवड सुधारण्याची गरज : इरफान

भारतीय फलंदाजांनी केलेल्या शॉटच्या निवडीबद्दल बोलताना इरफान म्हणाला की, “जर त्यांनी खराब शॉट्स खेळत राहिलो तर आम्हाला मोठी धावसंख्या कधीच दिसणार नाही.” इरफान म्हणतो, “त्यामुळे सुधारणेला वाव आहे. तुम्ही चुकीचे शॉट्स घेऊन विकेट्स गमावत राहिल्यास, मला वाटते की आम्ही बोलत आहोत ती मोठी धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळणार नाही. त्यामुळे हे लक्षात घेऊन शॉट सिलेक्शनमध्ये सुधारणा करणे अत्यंत आवश्यक आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दीपक हुड्डा ठरला सामनावीर

टी२० मालिकेतील या पहिल्या सामन्यात दीपक हुड्डा याचे अप्रतिम प्रदर्शन पाहून त्याला सामनावीर पुरस्कार दिला गेला. हुड्डाने २३ चेंडूत ४१ धावांची नाबाद खेळी केली. यादरम्यान त्याच्या बॅठमधून एक चौकार आणि चार उत्कृष्ट षटकात पाहायला मिळाले. गोलंदाजी विभागात शिवम मावीव्यतिरिक्त उमरान मलिक आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या.