पीटीआय, नवी दिल्ली

भारताचा तारांकित फलंदाज विराट कोहलीने वैयक्तिक कारणांमुळे इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील उर्वरित सामन्यांमधून माघार घेतली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शनिवारी संघाची घोषणा करताना कोहलीचा समावेश नसणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे कोहलीच्या सहभागाबाबत सुरू असलेल्या चर्चा आता संपुष्टात आल्या आहेत. कोहलीने पहिल्या दोन कसोटी सामन्यांतही सहभाग नोंदवला नव्हता.

Morne Morkel Unhappy on Hardik Pandya Bowling
IND vs BAN : बांगलादेशविरुद्धच्या T20I मालिकेपूर्वी गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्केल हार्दिकवर नाराज? जाणून घ्या कारण
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
batsman jemima rodrigues on t20 world cup
जेतेपदाच्या स्वप्नपूर्तीसाठी परिस्थितीनुसार खेळणे आवश्यक! ट्वेन्टी२० विश्वचषकाबाबत जेमिमाचे मत
Cameron Green Doubtful For Border-Gavaskar Trophy After Sustaining Back Injury In England ODIs
भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, ‘या’ स्टार अष्टपैलू खेळाडूला झाली दुखापत
Dinesh Karthik reaction about Rishabh Pant and MS Dhoni
IND vs BAN : ऋषभ पंत कसोटीत धोनीपेक्षा सरस आहे का? दिनेश कार्तिकने दिले उत्तर, चाहत्यांना केले ‘हे’ आवाहन
IND vs BAN Team India squad announced for 2nd test match
IND vs BAN : बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर! कोणत्या खेळाडूंना मिळाली संधी? जाणून घ्या
IND vs BAN 1st Test India beat Bangladesh by 280 Runs
IND vs BAN : ‘…म्हणून बांगलादेशी फिरकीपटूंविरुद्ध मुक्तपणे फटकेबाजी करु शकलो’, शुबमन गिलने सांगितले कारण
India beat Bangladesh by 280 Runs in 1st Test Ravichandran Ashwin fifer Rishabh Pant Shubman Gill Centuries
IND vs BAN: भारताचा बांगलादेशवर ऐतिहासिक विजय, गेल्या ९२ वर्षांत कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच घडली अशी गोष्ट

‘‘विराट कोहली वैयक्तिक कारणांमुळे उर्वरित सामन्यांच्या निवडीसाठी उपलब्ध नसेल. ‘बीसीसीआय’ कोहलीच्या या निर्णयाचा आदर करते,’’ असे ‘बीसीसीआय’ने आपल्या निवेदनात म्हटले आहे. कोहली सध्या कौटुंबिक कारणांसाठी विदेशात असल्याचे समजते आहे. सध्या पाच सामन्यांची कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. तिसरा कसोटी सामना १५ फेब्रुवारीपासून राजकोट येथे सुरू होणार आहे. वैयक्तिक कारणांमुळे कोहली अनुपलब्ध राहणार असल्याची कल्पना ‘बीसीसीआय’ला होती. मात्र, ७ ते ११ मार्च दरम्यान धरमशाला येथे होणाऱ्या अखेरच्या कसोटीसाठी तो उपलब्ध होईल का याची चाचपणी ‘बीसीसीआय’कडून केली जात होती. पण, त्यांच्या पदरी निराशा आली.

हेही वाचा >>>IND vs ENG Test : उर्वरित तीन सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा, दोन दिग्गजांचं पुनरागमन, दुखापतीमुळे श्रेयस संघाबाहेर

उर्वरित सामन्यांसाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमरा (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, केएल राहुल, रजत पाटीदार, सर्फराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप.