IND vs ENG 3rd Test: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना लॉर्ड्सच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा पहिला डाव ३८७ धावांवर आटोपला. इंग्लंडकडून फलंदाजी करताना जो रूटने शतकी खेळी केली. तर भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ५ गडी बाद केले.

दुसऱ्या दिवशी काय घडलं?

इंग्लंडचा पहिला डाव ३८७ धावांवर आटोपल्यानंतर, भारतीय संघाकडून केएल राहुल आणि यशस्वी जैस्वालची जोडी डावाची सुरूवात करण्यासाठी मैदानात आली. भारताला सुरूवातीलाच मोठा धक्का बसला. यशस्वी जैस्वाल १३ धावा करत माघारी परतला. त्यानंतर करूण नायर आणि केएल राहुल यांनी मिळून भारतीय संघाचा डाव सांभाळला. दोघांनी मिळून महत्वपूर्ण भागीदारी केली. मात्र, करूण नायर ४० धावा करत माघारी परतला. कर्णधार शुबमन गिल १६ धावांवर माघारी परतला. पहिल्या दिवशी भारतीय संघाने ३ गडी बाद १४५ धावा केल्या.

राहुल- पंतची शतकी भागीदारी

भारतीय संघाने तिसऱ्या दिवशी दमदार सुरूवात केली आहे. भारताकडून केएल राहुल आणि ऋषभ पंतची जोडी मैदानात आहे आहे. या दोघांनी मिळून शतकी भागीदारी केली आहे. यासह भारतीय संघाने २०० धावांचा पल्ला गाठला आहे.

भारताचाही पहिला डाव ३८७ धावांवर आटोपला

या सामन्यातील पहिल्या डावात इंग्लंडने ३८७ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाकडून सलामीवीर केएल राहुलने आपलं शतक पूर्ण केलं. यशस्वी जैस्वालने १३, करूण नायरने ४०, कर्णधार शुबमन गिलने १६, ऋषभ पंतने ७४, रवींद्र जडेजाने ७२, नितीश कुमार रेड्डीने ३०, आकाश दीपने ७ धावांची खेळी केली. आता भारतीय संघाचा डावही ३८७ धावांवर आटोपला आहे.

वटच्या षटकात नेमकं काय घडलं?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतीय संघाचा पहिला डाव आटोपल्यानंतर इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात फलंदाजी करण्यासाठी आला. इंग्लंडला तिसऱ्या दिवसातील शेवटचे ५ मिनिटं फलंदाजी करण्याची संधी मिळाली. दोन षटकांचा खेळ होणार होता. पण, जॅक क्रॉली आणि बेन डकेट यांनी वेळ वाया घालवला आधी साईट स्क्रीन आणि त्यानंतर दुखापतीचं कारण देत वेळ वाया घालवला. इंग्लंडला दुसऱ्या डावात २ धावा करता आल्या आहेत.