Rohit Sharma Statement On Two Young Players Of Mumbai Indians : आयपीएलमध्ये पाचवेळा जेतेपदावर शिक्कामोर्तब करणाऱ्या मुंबई इंडियन्सने यंदाच्या आयपीएलमध्ये जबरदस्त कामगिरी करून प्ले ऑफ मध्ये प्रवेश केला आहे. सुरुवात थोडी खराब झाल्यानंतर मुंबईने शेवटच्या टप्प्यात काही सामने जिंकून गुणतालिकेत चौथं स्थान गाठलं. मुंबईने १४ सामन्यांपैकी ८ सामन्यांमध्ये विजय मिळवला. गुजरात टायटन्सने आरसीबीचा पराभव केल्यानं मुंबईचा प्ले ऑफच्या सामन्यांसाठी क्वालिफाय झाली. लखनऊ सुपर जायंट्सविरोधात होणाऱ्या सामन्याआधी मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने दोन युवा खेळाडूंबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

रोहित माध्यमांशी बोलताना म्हणाला, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्यानंतर मुंबई इंडियन्समध्ये दोन नवख्या खेळाडूंनी कमाल केली आहे. तिलक वर्मा आणि नेहल वढेरा हे दोघेही पुढील काही वर्षांमध्ये मुंबई इंडियन्सच नाही तर टीम इंडियासाठीही स्टार खेळाडू बनतील. प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर, हार्दिक पांड्या आणि जसप्रित बुमराहसोबत असंच काहिसं घडलं आणि आता तिलक आणि नेहलसोबतही अशाचप्रकारच्या गोष्टी घडतील, अशी आशा आहे. पुढचे दोन वर्षे पाहिल्यानंतर लोक म्हणतील, अरे ही तर सुपरस्टार टीम आहे. नेहल आणि तिलक दोघेही खूप चांगले खेळाडू आहेत. भविष्यात दोघेही महान मुंबई इंडियन्स आणि टीम इंडियासाठी महान खेळाडू बनतील.”

Ashutosh Sharma's Reaction After Defeat
‘त्या प्रशिक्षकांना मी आवडत नसे, ते मला संघात घेत नसत. यामुळे मी नैराश्यात गेलो’, आशुतोष शर्माचा संघर्ष
Indian Premier League Cricket Mumbai vs Chennai ipl 2024 match sport news
इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट: मुंबई-चेन्नई आमनेसामने! पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांत आज वानखेडेवर होणाऱ्या द्वंद्वात धोनीवर लक्ष
rohit sharma virat kohli
ipl 2024, MI vs RCB: इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट: सलग दुसऱ्या विजयाचे लक्ष्य! मुंबई इंडियन्ससमोर आज वानखेडेवर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचे आव्हान
Green signal for Suryakumar Yadav to play in IPL
IPL 2024 : मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी! सूर्यकुमार यादव झाला तंदुरुस्त, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता

नक्की वाचा – “तोच रुबाब आणि तोच घमंड…”, CSK आयपीएलच्या फायनलमध्ये दहाव्यांदा पोहोचली, इरफान पठानने शेअर केला खास Video

इथे पाहा व्हिडीओ

तिलक वर्माने २०२२ मध्ये १४ सामन्यांमध्ये ३९७ धावा केल्या होत्या. तर यंदाच्या हंगामात त्याने ९ सामन्यांमध्ये २७४ धावा केल्या आहेत. वर्माने ४५.६७ च्या सरासरीनं आणि १५८.३८ च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या आहेत. तर दुसरीकडे नेहल वढेराने याच आयपीएल हंगामात १२ सामन्यांमध्ये २१४ धावा केल्या आहेत. नेहलने ३०.५७ च्या सरासरीनं आणि १४१.७२ च्या स्ट्राईक रेटनं या धावा कुटल्या आहेत.