नवी दिल्ली

महिला कुस्तीगिरांचे जंतरमंतरवरील आंदोलन दिल्ली पोलिसांनी चिरडून टाकल्यानंतर, केंद्र सरकारवर दबाव वाढू लागला आहे. केंद्र सरकार खेळाडूंच्या बाजूचे असून खेळाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न सातत्याने होत आहे. त्यामुळे दिल्ली पोलिसांची चौकशी पूर्ण होईपर्यंत आंदोलक खेळाडूंनी टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी बुधवारी केले.

Action taken by Tihar administration after Delhi Chief Minister Arvind Kejriwal  blood sugar rises
केजरीवालांना इन्सुलिन; रक्तातील साखर वाढल्यानंतर तिहार प्रशासनाकडून कार्यवाही
Latest News on Mamata Banerjee
पश्चिम बंगालमधील शालेय कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द; उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे राज्य सरकारला धक्का
Sales of e-vehicles pune
गडकरींनी वारंवार सांगूनही लोकांनी फिरवली पाठ! ई-वाहनांच्या विक्रीला गती मिळेना
mumbai high court marathi news, cm eknath shinde marathi news
शहीदांच्या कुटुंबीयांप्रती मुख्यमंत्र्यांनी मनाचा मोठेपणा दाखवावा, शहीद मेजर सूद यांच्या पत्नीच्या मागणीबाबत उच्च न्यायालयाची टिपण्णी

राष्ट्रीय कुस्तीगीर महासंघाचा कार्यकाळ संपल्याने पायउतार झालेले अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप महिला कुस्तीगिरांनी केले आहेत. तरीही त्यांना अटक न केल्यामुळे आंदोलकांनी संसदेवर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला होता. त्यांचा मोर्चा आणि आंदोलन पोलिसांनी मोडून काढल्यानंतर मंगळवारी ऑलिम्पिक विजेत्या कुस्तीगिरांनी हरिद्वारमध्ये ऑलिम्पिक पदके गंगेत विसर्जित करण्याचा निर्णय घेतला होता. शेतकरी नेते नरेश टिकैत यांच्या विनंतीनंतर हा निर्णय रद्द करून त्यांनी सरकारला पाच दिवसांची मुदत दिली आहे. या पार्श्वभूमीवर ठाकूर यांनी आंदोलकांना सबुरीचा सल्ला दिला.