India vs New Zealand: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना बुधवारी हैदराबादमध्ये होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांनी जोरदार तयारी केली आहे. भारताने अलीकडेच एकदिवसीय मालिकेत श्रीलंकेचा ३-० असा पराभव केला आहे. आता ती न्यूझीलंडविरुद्ध मैदानात उतरणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषद घेतली. यात त्याने वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचे कौतुक केले. रोहितने सांगितले की, सिराजने गेल्या २ वर्षांत गोलंदाजीत बरेच बदल केले आहेत. सिराज आता भारतीय संघासाठी घातक शस्त्र बनला आहे.

टीम इंडियाचा धडाकेबाज वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह त्याच्या करिअरसाठी मोठा धोका बनला आहे. हा वेगवान गोलंदाज आता जसप्रीत बुमराहपेक्षा टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या अधिक विश्वासार्ह आणि जवळचा बनला आहे. कर्णधार रोहित शर्माचा हा सर्वात विश्वासार्ह वेगवान गोलंदाज इतका जीवघेणा आहे की खेळपट्टीवरच प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांचे पाय थरथर कापतात. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड फास्ट बॉलर मोहम्मद सिराजच्या कामगिरीवर खूप खूश आहेत आणि आता हा फास्ट बॉलर २०२३च्या विश्वचषकामध्येही खेळताना दिसणार आहे.

मोहम्मद सिराज रोहित शर्माची गोलंदाज म्हणून पहिली पसंती

कर्णधार रोहितने सिराजचे कौतुक करताना सांगितले की, “सिराजने गेल्या दोन वर्षांत संघासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये कशी कामगिरी केली ते आम्ही पाहिले आहे आणि तो आमच्यासाठी खूप महत्त्वाचा खेळाडू आहे.” म्हणूनच तुम्ही त्यांना कसे सांभाळत आहात, कसे ताजेतवाने ठेवत आहात ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. या दोन वर्षांत त्याने गोलंदाजीत विशेषत: लाइन आणि लेन्थमध्ये बरीच सुधारणा केली आहे. त्याचा आऊट स्विंग आपण अलीकडे पाहत आहोत. पूर्वी तो त्याच्या इन स्विंगसाठी ओळखला जात होता. मात्र गेल्या मालिकेत त्याने सातत्याने नव्या चेंडूवर स्विंग केले. संघासाठी ही खूप चांगली गोष्ट आहे.

हेही वाचा: BBL2023 Steve Smith: नशीब असावं तर असं…! शतकवीर स्मिथ स्टंपला चेंडू लागला तरीही नाबाद, Video व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारताची लोअर ऑर्डर म्हणजेच खालची फलंदाजी खूप कमी होत आहे

श्रीलंकेविरुद्ध मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी आणि उमरान मलिक हे भारताचे महत्वाचे वेगवान गोलंदाज होते. लेगस्पिनर युजवेंद्र चहलला त्याच्यासोबत प्लेइंग ११ मध्ये समाविष्ट केले तर भारताची लोअर ऑर्डर म्हणजेच तळाचे फलंदाज खूप कमी होतील. चहल आणि कुलदीप यादव यांचा उल्लेख करताना भारतीय कर्णधार म्हणाला, “हे असे खेळाडू आहेत जे आम्हाला संघासाठी आवश्यक असलेली स्थिरता देऊ शकतात, परंतु दोन्ही रिस्ट फिरकीपटूंना एकाचवेळी संघात स्थान देता येणार नाही.”