Ind vs AUS 3rd T20 highlights Score Updates: आशिया चषकातील पराभवानंतर भारतीय संघ जोरदार ट्रोल झाला होता. पण बलाढ्य ऑस्ट्रेलियावरआजच्या तिसऱ्या सामन्यात भारताने दणदणीत विजय साकारला. या विजयासह भारताने मालिकाही २-१ अशी जिंकली आहे. ऑस्ट्रेलियाने भारतापुढे विजयासाठी १८७ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला लोकेश राहुल आणि रोहित शर्मा यांच्या रुपात दोन धक्के बसले. पण त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि विराट कोहली यांनी धडाकेबाज फटकेबाजी केली. त्यामुळेच भारताला या सामन्यात सहा विकेट्स राखून विजय मिळवता आली. सूर्याने यावेळी ६९ धावा केल्या, तर कोहलीने ६३ धावांची खेळी साकारली.
खेळपट्टीच्या हिशोबाने ऑस्ट्रेलियाने गोलंदाजी करत भारतीय संघाला बांधून ठेवले होते. त्यामुळे भारताला मुक्तपणे फटकेबाजी करता आली नाही. पहिल्या पॉवर प्ले मध्ये सलामीवीर तंबूत परतल्याने भारतीय संघ अडचणीत आला. पहिल्या सहा षटकात भारत ५० धावा केल्या. लामीवीर बाद झाल्यानंतर कोहली आणि सुर्याकुमार यादवने डाव सावरला आणि ३६ चेंडूत ५० धावांची भागीदारी केली. भारताने पहिल्या दहा षटकात ९१ धावा केल्या आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने पॉवर प्लेमध्ये आक्रमक फलंदाजी करण्यास सुरूवात केली. कॅमेरून ग्रीनने तुफान फटकेबाजी करत ५ षटकात ६१ धावा करून दिल्या. १९ चेंडूत त्याने ५० धावा करत अर्धशतक साजरे केले. पण त्याला भुवनेश्वर कुमारने बाद केले. त्यानंतर भारतीय संघ सामन्यात परत आला आहे. पहिले १० षटके ही दोन्ही संघांसाठी समसमान राहिली आहेत. आधीच्या फटकेबाजी नंतर भारतीय संघाने चार गडी बाद करत सामन्यात रंगत आणली आहे.
India and Australia 3rd T20 Highlights; भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा टी २० सामना हायलाइट्स
२ चेंडूत ४ धावांची गरज भारत १८३-४
अखेरच्या षटकात विराट कोहली बाद झाला. त्याने ६३ धावा केल्या. भारत १८२-४
शेवटच्या दोन षटक भारतासाठी महत्वाची आहे. त्यात भारताला २१ धावांची गरज
भारत १६६-३
विराट कोहलीने ३७ चेंडूत अर्धशतक झळकावले. भारत १४७-३
ऐनवेळी सुर्यकुमार यादव बाद झाल्याने आता सगळी जबाबदारी विराट कोह्लीवर आली आहे. भारत १३४-३
विराट आणि सुर्यकुमार यादव यांच्यात १०० धावांची भागीदारी झाली असून त्या भागीदारीने भारताला विजया दृष्टीने एक पाऊल टाकले. भारत १३२-२
सुर्यकुमार यादवने गगनभेदी षटकार मारत अवघ्या २७ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. भारत ११५-२
सलामीवीर बाद झाल्यानंतर कोहली आणि सुर्याकुमार यादवने डाव सावरला आणि ३६ चेंडूत ५० धावांची भागीदारी केली. भारताने पहिल्या दहा षटकात ९१ धावा केल्या आहे.
भारत ९१-२
खेळपट्टीच्या हिशोबाने ऑस्ट्रेलियाने गोलंदाजी करत भारतीय संघाला बांधून ठेवले. त्यामुळे भारताला मुक्तपणे फटकेबाजी करता आली नाही. पहिल्या पॉवर प्ले मध्ये सलामीवीर तंबूत परतल्याने भारतीय संघ अडचणीत आला. भारत ५०-२
रोहित शर्माच्या रूपाने भारताला दुसरा झटका बसला आहे. त्याच्या बाद होण्याने ऑस्ट्रेलिया सामन्यात वरचढ झाली आहे. त्याने १४ चेंडूत १७ धावा केल्या. भारत ३०-२
भारताची सलामी जोडी मैदानात आली आणि लगेचच केएल राहुल बाद झाला. तो अवघी एक धाव करून बाद झाला. भारत ५-१
भारताला १८७ धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाने दिले आहे. ऑस्ट्रेलिया १८६- ७
अर्धशतकनंतर डेविड बाद झाला. हर्षल पटेलला मिळाला त्याचा पहिला बळी, डेविड २७ चेंडूत ५४ धावा करत आपली विकेट गमावली. ऑस्ट्रेलिया १८५-७
टिम डेविडने षटकार खेचत अर्धशतक पूर्ण केले. ऑस्ट्रेलिया १८५-६
ऑस्ट्रेलियन डावाची तीन षटके बाकी असून ती भारतीय संघाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहेत. कारण अखेरच्या षटकांत भारत नेहमी धावा जास्त देतो. त्यामुळे सामन्यावर असलेली पकड अशीच ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. ऑस्ट्रेलिया १४०-६
एकाच षटकात अक्षरने दोन धक्के देत ऑस्ट्रेलियाला बॅक फुट वर ढकलले आहे. मागच्या सामन्यात तुफानी खेळी करणारा मॅथ्यू वेड अवघी एक धाव काढून बाद झाला.
ऑस्ट्रेलिया ११७-६
अक्षरने जोश इंग्लिसला बाद केले असून भारतीय संघाने सामन्यावर पकड तयार करण्यास सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलिया ११५-५
ऑस्ट्रेलिया संघाच्या १०० धावा पूर्ण झाल्या असून त्यांनी त्या १३ षटकांत केल्याने भारतीय संघावर धावा रोखण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. ऑस्ट्रेलिया १०३ -४
युझवेंद्र चहलने स्टीव्ह स्मिथला बाद केले. त्याने १० चेंडूत ९ धावा केल्या. ऑस्ट्रेलिया ८४-४
अक्षर पटेलच्या उत्कृष्ट थ्रो ने ग्लेन मॅक्सवेल बाद झाला त्याने ११ चेंडूत ६ धावा केल्या. ऑस्ट्रेलिया ७५-३
मालिकेत हार्दिकच्या गोलंदाजीवर दुसऱ्यांदा झेल सोडला. अक्षर पटेलने स्मिथला जीवदान दिले. ७ षटकानंतर ऑस्ट्रेलिया ७१-२
पहिल्या पॉवर प्ले नंतर ऑस्ट्रेलियाची चांगली सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलिया ६६-२
भारतला मोठे यश मिळाले. कॅमेरॉन ग्रीनने २१ चेंडूत ५२ धावा केल्या. ऑस्ट्रेलिया ६२-२
कॅमेरॉन ग्रीनचे करो या मरो सामन्यात अर्धशतक साजरे केले. त्याने १९ चेंडूत ५० धावा केल्या. ऑस्ट्रेलिया ५८-१
अक्षर पटेलला पहिली विकेट मिळाली आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ॲरॉन फिंच बाद झाला. त्याने ६ चेंडूत ७ धावा केल्या. ऑस्ट्रेलिया ४४-१
कॅमेरॉन ग्रीनची फटकेबाजी सुरु झाली असून त्याला लवकरात लवकर बाद करणे भारतीय संघाला आवश्यक आहे. तीन षटकानंतर ऑस्ट्रेलियाने उत्तम सुरुवात केली आहे.
ऑस्ट्रेलिया ४०-०
अंतिम सामन्याला सुरुवात झाली असून भूवीच्या पहिल्या चेंडूवर फटका हवेत मारला होता पण पांड्या तिथेपर्यंत पोहचला नाही. पहिल्या षटकात कॅमेरॉन ग्रीनची आतषबाजी सुरु झाली. एक षटकार आणि एक चौकार मारले.
ऑस्ट्रेलिया १२-०
भारत:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, जसप्रीत बुमराह
ऑस्ट्रेलिया:
ॲरॉन फिंच (कर्णधार), पॅट कमिन्स, टिम डेव्हिड, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, डॅनियल सॅम्स, स्टीव्ह स्मिथ, मॅथ्यू वेड, ॲडम झम्पा
ॠषभ पंत ऐवजी भुवनेश्वर कुमारला अंतिम संघात रोहित शर्माने स्थान दिले. तर ऑस्ट्रेलियाने जोश इंग्लिसला शॉन ॲबॉट ऐवजी संधी दिली.
भारतीय संघाने शेवटच्या सामन्यात नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.