Actress Saumya Tandon Shares Five Healthy Habits : अभिनेता असो किंवा अभिनेत्री त्यांना फिट राहण्यासाठी अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो. डाएट, वर्कआउट, योग्य अन्न या सगळ्याच गोष्टी त्यांना फॉलो कराव्या लागतात. तर अनेक सेलिब्रिटी त्यांच्या फिटनेसचे रहस्य सोशल मीडियावर व्हिडीओद्वारे सांगत असतात. आज भाभीजी घर पर है फेम अभिनेत्री सौम्या टंडनने तिच्या आयुष्यातील ५ सवयींबद्दल सांगितले आहेत; ज्यांनी तिचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकले.
१. साखर
साखर, मध, गुळाचे सेवन करण्याची तुम्हाला गरज नाही . कारण यामधून कोणतेही आरोग्य फायदे मिळत नाहीत ; असे याबद्दल अभिनेत्री सौम्या टंडन म्हणाली. तर याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी द एस्क्प्रेसने झांद्रा हेल्थकेअरमधील मधुमेहशास्त्राचे प्रमुख आणि रंग दे नीला इनिशिएटिव्हचे सह-संस्थापक डॉक्टर राजीव कोविल यांच्याशी चर्चा केली. त्यांनी सांगितले की, साखर जगातील सर्वात मोठे व्यसन आहे.
साखर सोडल्यानंतर काही दिवसांतच तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण स्थिर होते, ज्यामुळे ऊर्जा कमी होऊन साखरे खाण्याची तीव्र इच्छा कमी होते. इन्सुलिनचे प्रमाण कमी होते, ज्यामुळे चरबी जाळण्यास मदत होते आणि उर्जेची पातळी सुधारते,” असे ते म्हणाले. ऊर्जा स्थिर राहते आणि मूड स्विंग कमी होतात. बरेच लोक अधिक सतर्क आणि लक्ष केंद्रित करायला लागतात. साखर कमी केल्याने जळजळ लक्षणीयरीत्या कमी होते, सांधेदुखी कमी होते आणि चेहऱ्यावर मुरुम सुद्धा कमी होतात ; असे डॉक्टर कोविल पुढे म्हणाले.
क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट आणि मधुमेह शिक्षक कनिका मल्होत्रा यांच्या मते, साखरेचे प्रमाण जास्त असल्यास त्याचे चरबीमध्ये रूपांतरत होते आणि ही चरबी संपूर्ण शरीरात साठवली जाते. यामुळे वजन वाढू शकते आणि हृदयरोग, टाइप २ मधुमेह आणि काही कर्करोग यांसारख्या दीर्घकालीन आरोग्य समस्यांचा धोका वाढू शकतो.
२. व्यायाम
सहा महिने व्यायाम करून नंतर सवय सोडून देऊ नका. तुमच्या व्यायाम करण्याच्या सवयीत सातत्य ठेवा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, वजन उचला. विशेषतः महिलांनी केले पाहिजे ; असे अभिनेत्री सौम्या टंडन म्हणाली आहे.
तर याबद्दल मुंबईतील परळ येथील ग्लेनेगल्स हॉस्पिटलमधील ऑर्थोपेडिक्सचे वरिष्ठ सल्लागार डॉक्टर अनुप खत्री यांच्या मत आहे की, शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहिल्याने स्नायूंची ताकद सुधारते आणि सहनशक्ती वाढते. धावणे सारख्या व्यायाम प्रकारांमुळे स्नायू तयार होण्यास, सहनशक्ती वाढते आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य सुधारण्यास मदत होते.
स्प्रिंटिंगमुळे कॅलरीज बर्न होण्यास आणि वजन कमी करण्यास आणि शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते. फक्त व्यायाम करण्यात सातत्य असणे महत्त्वाचे आहे. व्यायाम करण्याच्या सवयीत वारंवार ब्रेक घेतल्याने संपूर्ण प्रक्रिया विस्कळीत होऊ शकते, ज्यामुळे तुमचे स्नायू त्यांच्या नैसर्गिक स्वरूपात परत येतात.
३. तुमचे विचार लिहून काढा
तुमच्या डोक्यात काही कल्पना असतील, तुम्हाला आयुष्यात काही करायचं आहे त्याबद्दल मन मोकळेपणाने लिहा; असे अभिनेत्री सौम्या टंडन म्हणाली आहे.
तर याबद्दल मानसशास्त्रज्ञ आणि सेंटीअर वेलनेसच्या संस्थापक डॉक्टर रिंपा सरकार यांनी द इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, तुमचे विचार आणि ध्येये लिहिल्याने तुम्हाला जीवनातील कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्याच्या संकेत मिळतात ज्यामुळे तुम्ही प्रेरित राहता. यामुळे मेंदूतील रेटिक्युलर अॅक्टिव्हेटिंग सिस्टिम(RAS)) देखील सक्रिय करते, ज्यामुळे तुम्हाला या संधींची अधिक जाणीव होते.
४. वाचन
दिवसाला पुस्तकाची १० ते २० पाने वाचा. यामुळे तुमचे व्यक्तिमत्व सुधारते. जेव्हा तुम्ही वाचता तेव्हा तुम्हाला इतरांनाही बोलायला सुद्धा विषय मिळतात; असे अभिनेत्री सौम्या टंडन म्हणाली आहे.
तर याबद्दल दिल्लीस्थित मानसोपचारतज्ज्ञ डॉक्टर उमा नायडू यांनी सांगितले की, वाचनाचे मानसिक आरोग्यासाठी विविध फायदे आहेत. आनंददायी वाचनाचा वापर तुम्हाला आराम करण्यास आणि दैनंदिन जीवनातील धावपळीतून विश्रांती घेण्यासाठी केला जाऊ शकतो. वाचन हे एकाग्रतेशी संबंधित आहे आणि तुमची संज्ञानात्मक क्षमता बळकट करण्यास देखील मदत करते. वाचनानंतर तुमच्या झोपेची गुणवत्ता सुधारेल, जी सहानुभूती विकासाशी देखील जोडली जाईल. तुमचे लक्ष वाढवण्यासाठी, तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी एक साधन म्हणून तुम्ही वाचनाचा वापर करू शकता.
५. झोपण्यापूर्वी फोन / लॅपटॉप वापरणे
झोपण्यापूर्वी एक तास आधी फोन, लॅपटॉपवापरू नका. सोशल मीडियापासून लांब रहा. शक्य असल्यास फोन तुमच्या बेडरूम बाहेर ठेवा. तुमच्या प्रियजनांशी बोला, काहीतरी वाचा ; असे अभिनेत्री सौम्या टंडन म्हणाल्या आहेत.
याबद्दल कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल मुंबईचे सल्लागार, मानसोपचारतज्ज्ञ डॉक्टर शौनक अजिंक्य यांनी सांगितले की, रात्री स्मार्टफोन उपकरणांचा जास्त वापर केल्याने झोप न लागणे किंवा रात्री अस्वस्थता येऊ शकते. फोन स्क्रीनमधून निघणाऱ्या निळ्या प्रकाशामुळे हे घडते, जे मेलाटोनिन उत्पादनात व्यत्यय आणते आणि शरीराच्या नैसर्गिक झोपेच्या चक्रात व्यत्यय आणू शकतात.