नवापूर तालुक्यात रविवारी सायंकाळी वीज कोसळून दोन ठार तर तीन जण जखमी झाले. नवापूर परिसरात सायंकाळी साडेपाचच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसास सुरुवात झाली.
  भरडू येथे वीज कोसळून हंसराज भरत पाडवी (५०) आणि हर्षल सुरेश वळवी (१०) हे दोघे ठार झाले. तर, त्यांच्यासमवेत असलेले नीहिहा वळवी, अशोक वळवी, गोटूबाई वळवी हे तिघे जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
विसरवाडी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.