सांगली जिल्ह्यातील निवडणूक होत असलेल्या ४४७ गावापैकी ३८ गावच्या सरपंचांची बिनविरोधी निवड झाली असून ग्रामपंचायतीचे ५७० सदस्यही बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित ४०९ गावच्या सरपंच आणि ४ हजार १४६ ग्रामपंचायत सदस्य निवडीसाठी १८ डिसेंबरला मतदान होणार आहे.

हेही वाचा- “फुले-आंबेडकर, कर्मवीरांनी शाळा सुरु करण्यासाठी भीक मागितली”, चंद्रकांत पाटलांचं विधान

42 gangster tadipaar from pune city
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकाच वेळी शहरातील ४२ गुंड तडीपार
amol kolhe marathi news, shivajirao adhalarao patil marathi news
“उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी शिवाजी आढळराव पाटील पराभूत झाले!”, ‘त्या’ विधानावरून अमोल कोल्हेंचा टोला
Withdrawal of Dr Chetan Narke from Kolhapur Lok Sabha Constituency
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून डॉ. चेतन नरके यांची माघार; पाठिंब्याचा निर्णय गुलदस्त्यात
Yavatmal Lok Sabha seat, mahayuti, lok sabha 2024, maha vikas aghadi, Candidate, Lack of Local, Performance Record, wrath of citizens, yavatmal politics news, washim politics news, washim news,
लोकसभेच्या रिंगणात उमेदवारांची उणीदुणी; जनतेचे मनोरंजन! उमेदवारांनी विकासावर बोलण्याची मतदारांची अपेक्षा

सांगली जिल्ह्यातील ४४७ ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम सुरू असून निम्मा जिल्हा निवडणुकीमध्ये दंग आहे. उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुदत संपल्यानंतर ३८ गावचे सरपंच आणि ५७० सदस्य अविरोध निवडून आल्याचे स्पष्ट झाले. आता सरपंच पदाच्या ४०९ जागासाठी १ हजार १२० तर सदस्य पदाच्या ४ हजार १४६ जागासाठी ८ हजार ६०४ उमेदवार आपले भविष्य अजमावत आहेत.

हेही वाचा- महाराष्ट्रातही ‘लव्ह जिहाद’संदर्भात कायदा होणार? देवेंद्र फडणवीस म्हणतात, “आम्ही याबाबत…”!

जिल्हा मध्यवतीर्र् बँकेचे संचालक, भाजपचे युवा नेते राहूल महाडिक यांच्या येलूर गावच्या सरपंच पदासाठी अविरोध निवड झाली आहे. याशिवाय कोळे, चिखली, खुंदलापूर, येवलेवाडी, गार्डी, ढवळेश्‍वर, माधळमुठी, सवाळवाडी, वासुंंबे, वाकाईवाडी, गौरवाडी, विठ्ठलवाडी, शिवपुरी, भरतवाडी, तांदूळवाडी, बनेवाडी आदी गावातील सरपंच निवडी अविरोध झाल्या आहेत. शिराळा तालुक्यातील कोकरूड, शिवरवाडी, भैरेवाडी, फुफिरे, चिखल, खुंदलापूर, वाकाईवाडी, शिंदेवाडी, तासगाव तालुक्यातील चिंचणी, कवठेमहांकाळ तालुक्यातील आरेवाडी, कडेगाव तालुक्यातील विहापूर, येवलेवाडी, खानापूर तालुक्यातील गार्डी, ढवळेश्‍वर, माधळमुठी, वासुंबे, धोंडेवाडी, मिरज तालुक्यातील सावळवाडी, जत तालुक्यातील रेवनाळ, शिंगणापूर, पलूस तालुक्यातील पुणदीवाडी, हजारवाडी आदी ग्रामपंचायती अविरोध झाल्या आहेत.