मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य केल्याचे सांगून राज्य सरकारने अध्यादेश काढून तो मनोज जरांगे पाटील यांच्या हाती दिला. त्यानंतर जरांगे पाटील यांनी काढलेला मोर्चा वाशी येथे दि. २७ जानेवारी रोजी समाप्त झाला. पण यानंतर आता राज्यातून विविध संघटना आणि ओबीसी नेते टीका करत आहेत. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी सरकारच्या अध्यादेशावर टीका करताना ‘सरकारने मराठ्यांच्या तोंडाला पाने पुसली’, असा आरोप त्यांनी केला होता. या आरोपानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

‘एक ओबीसी, लाख ओबीसी म्हणणार का?’, पंकजा मुंडेंच्या सल्ल्यावर मनोज जरांगे पाटील म्हणाले…

amol mitkari on tanaji sawant
Amol Mitkari : अजित पवार गटाबाबत केलेल्या विधानावरून अमोल मिटकरींचा मंत्री तानाजी सावंतांना टोला; म्हणाले, “जे खेकड्यामुळे धरण फुटले म्हणू शकतात, ते…”
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
jammu Kashmir polls
विश्लेषण: निष्ठावंतांची नाराजी भाजपला जम्मू व काश्मीरमध्ये भोवणार? नव्या चेहऱ्यांना संधी?
Rajendra Raut, Manoj Jarange,
सोलापूर : ओबीसीतून मराठा आरक्षणप्रश्नी पवार, ठाकरे, पटोलेंच्या सह्या आणा; राजेंद्र राऊत यांचे मनोज जरांगे यांना आव्हान
Bhagyashree Dharmarao Atram is an election candidate from Sharad Pawar group against Dharmarao Baba
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांविरोधात त्यांच्या कन्येला उमेदवारी, अनिल देशमुखांनी स्पष्टच सांगितले…
Nashik, Badlapur incident, Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Devendra Fadnavis, women empowerment campaign, Tapovan Maidan, opposition politicization,
करोना केंद्रांमधील अत्याचारावेळी गप्प का ? एकनाथ शिंदे यांच्याकडून उध्दव ठाकरे लक्ष्य
eknath shinde reaction on manoj jarange
Eknath Shinde : “देवेंद्र फडणवीसांवर होणारे आरोप खोटे, मराठा आरक्षणासाठी त्यांनी…”; मनोज जरांगेंच्या ‘त्या’ आरोपावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया
Aditya Thackeray criticized the Shinde government
शिंदे सरकार अदानींच्या खिशात; आदित्य ठाकरे यांची जोरदार टीका

राज्याचे कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई यांच्या मुलाच्या लग्नासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा येथे आले आहेत. यावेळी माध्यमांशी बोलत असताना त्यांनी अध्यादेशावर होणाऱ्या टीकेला उत्तर दिले. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “मराठा समाजाला गेले अनेक वर्ष आरक्षणापासून वंचित राहावे लागले होते. महायुतीचे सरकार सर्वसामान्यांचे सरकार आहे. आमच्या सरकारची भूमिका होती की, मराठा समाजाला आरक्षण दिलेच पाहीजे. पण ते कायद्यात बसणारे, टिकणारे आणि ओबीसी समाजावर अन्याय न करता आरक्षण द्यावे, ही आमची भूमिका काल होती, आज आहे आणि उद्याही राहिल.”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, “ओबीसी किंवा इतर समाजातील लोकही आमचेच आहे. तसंच हे सरकारही सर्व समाजांनी मिळून बनलेले आहे. त्यामुळे एकाचं काढून दुसऱ्याला देण्याचं काम सरकार करणार नाही. माझी सर्व नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की, मनोज जरांगे पाटील यांनी जे आंदोलन उभे केले, त्यात लाखो मराठा बांधव सामील झाले. कुणबी नोंदी सापडू लागल्या. न्यायाधीश शिंदे समिती त्यावर काम करत आहे. मराठा समाजाला न्याय मिळाला पाहीजे, ही भूमिका सर्वांनीच घेतली होती. मग तरीही मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसली, असे वक्तव्य करणे, सर्वेक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे, हे सर्व थांबवलं पाहीजे.”

“…तोपर्यंत हे आंदोलन चालू राहील”, मनोज जरांगे पाटलांनी आंतरवली सराटीत स्पष्ट केली भूमिका!

“मराठा समाजाने अनेक नेत्यांना मोठं केलं, पण नेत्यांनी मराठा समाज वंचित ठेवला. आज मराठा समाजाला इतर समाजावर अन्याय न करता देण्याची वेळ आली, तेव्हा कुणीही समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करू नये, अशी माझी आणि सरकारची भूमिका आहे”, असेही मुख्यंमत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सरकारचा निषेध केला. ते म्हणाले की, “मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यांना फाटा देऊन सरकारने अध्यादेश काढला. मुळात ५७ लाख नोंदी सापडल्या नाहीत. सरकारने मनोज जरांगे यांची दिशाभूल केली आहे. मुख्यमंत्र्यांनी आजवर फसवी आश्वासने दिली. मराठा आणि कुणबी हे वेगवेगळ्या पद्धतीने दाखविण्याचा प्रयत्न होतोय. सगेसोयरे याचे स्पष्टीकरण द्यावे. राज्य सरकारने मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसली.”