लोकसत्ता प्रतिनिधी

सोलापूर : सोलापूर आणि माढ्यासाठी भाजपकढून लोकसभेच्या उमेदवारी अर्ज भरताना पक्षाला ताकद देण्यासाठी आलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरच्या जुन्या प्रस्थापित नेत्यांकडून दुष्काळी भागात पाणी पोहोचविता आले नाही म्हणून केलेल्या टीकेला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी प्रत्युत्तर देताना फडणवीस यांना टोला लगावला. रेटून खोटे बोलण्याचे भरपूर संस्कार फडणवीस यांच्यावर झाल्याचे दिसतात, अशी टिप्पणीही त्यांनी केली.

Jitendra Awhad, amit shah, corruption,
…मग समजेल भ्रष्टाचारांचा सरदार कोण, आमदार जितेंद्र आव्हाड यांची शहांवर टीका
union home minister amit shah likely to kolhapur for inauguration with condition
केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडून कोल्हापूर जिल्हा बँकेची अशी ही ‘झाडा’झडती; उद्घाटनासाठी येण्याकरीता १० हजार झाडे लावण्याची सक्ती
dharmarao baba atram
तिसऱ्या आघाडीची चर्चा असतानाच शरद पवार- छगन भुजबळ भेटीवर राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचे महत्वपूर्ण विधान…
Union Minister Nitin Gadkari Goa Speech
नितीन गडकरी यांनी टोचले भाजपा नेत्यांचे कान,”चांगले दिवस आले की आपण जुन्या काळातला संघर्ष…”
cm eknath shinde
भारतीय संघाला दिलेल्या ११ कोटी रुपयांच्या बक्षिसावरून विरोधकांची टीका; CM शिंदेंनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले, “कसाबला…”
Kalyan East Assembly Constituency BJP aspirant Narendra Pawar from Kalyan Paschim is likely to get candidature print politics news
कारण राजकारण: शिंदे गायकवाड बेबनावामुळे पवारांचे ‘कल्याण’?
Criticism of Eknath Shinde government regarding Rabindra Waikar investigation closed by the ed print politics news
खासदार वायकर यांना अभय; विरोधकांची टीका; सोमय्या कुठे गेले, काँग्रेसचा सवाल
PM Narendra Modi Mocks Rahul Gandhi
नरेंद्र मोदींनी उडवली राहुल गांधींची खिल्ली, “काँग्रेसकडून पडलेल्या लहान पोराचं मन रमवण्याचा प्रकार..”

माढ्याचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यासह सुशीलकुमार शिंदे यांच्या निवासस्थानी भेट देऊन राजकीय खलबते केली. यावेळी झालेल्या स्नेहभोजनातून शिंदे आणि मोहिते यांच्यात स्नेह जुळल्याचे संकेत मिळाले.

आणखी वाचा-सांगलीच्या रक्तातच बंड, आता माघार नाही – विशाल पाटील

याचवेळी बोलताना सुशीलकुमार शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. फडणवीस यांनी सोलापुरात दुष्काळी भागाला ४०-५० वर्षे पाणी मिळाले नाही. त्याबद्दल ४० वर्षे सत्ता भोगणा-या प्रस्थापित नेत्यांना दोष दिला. यातून फडणवीस यांनी सुशीलकुमार शिंदे आणि विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यावर थेट नामोल्लेख टाळून टीका केल्यानंतर त्यास प्रत्युत्तर देताना सुशीलकुमार शिंदे म्हणाले, सोलापूर जिल्हा पारंपारिक दुष्काळी आहे. ४५ वर्षांपूर्वी एकमेव उजनी धरण उभारले गेले. त्याचे पाणी सोलापूर जिल्ह्यास पुरत नाही. तरीही त्यातून सोलापूरचे चित्र बदलत असून ऊस, फळबागा आदी नगदी पिकांच्या माध्यमातून दुष्काळावर ब-यापैकी मात झाली आहे. सोलापूर हे पुणे किंवा नागपूर नाही, ज्याठिकाणी एकापेक्षा लहानमोठी धरणे आहेत. त्याची फडणवीस यांना माहिती नसेल किंवा बहुतेक त्याचा त्यांना विसर पडला असावा, असा टोला सुशीलकुमार शिंदे यांनी लगावला. फडणवीस यांच्यावर रेटून खोटे बोलण्याचे भरपूर संस्कार झालेले दिसतात, अशीही खरमरीत टीका त्यांनी केली.