वाई:डॉ डी वाय पाटील यांनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात ठसा उमटवला आहे. या क्षेत्रामध्ये त्यांचे अतिशय मोठे योगदान असल्याचे विधान परिषदेचे माजी सभा सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी म्हंटले आहे. माजी राज्यपाल डॉ डी वाय पाटील यांना आज बुधवारी किसन वीर सातारा साखर कारखान्याच्या वतीने देण्यात येणारा आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला . यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला कारखान्याचे अध्यक्ष आमदार मकरंद पाटील कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे मार्गदर्शक संचालक व सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे, बाळासाहेब सोळस्कर,नितीन भरगुडे पाटील सर्व संचालक आदी उपस्थित होते.
हेही वाचा >>> “जेजुरीला पहिल्यांदाच आले आणि…”, काठी आणि घोंगडं देऊन सत्कार झाल्यावर भारावल्या पंकजा मुंडे
रामराजे म्हणाले,सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून सुरु केलेली डॉ डी वाय पाटील यांची कारकीर्द त्यांना पुढे अनेक मोठमोठ्या पदांपर्यंत घेऊन गेली. कार्यकर्ता, महापौर, आमदार ते अगदी राज्याचे राज्यपाल, असा थक्क करणारा प्रवास त्यांचा प्रवास आहे. त्यांच्या कार्याचा ठसा हा देशातच नव्हे तर परदेशातही उमटवलेला आहे. कारखान्याचे अध्यक्ष आमदार मकरंद पाटील म्हणाले समाजामधील अत्यंत कर्तबगार व्यक्तींना आबासाहेब वीर सामाजिक पुरस्काराने गौरविण्यात येते. डॉ डी वाय पाटील एक असामान्य कर्तुत्व आणि नेतृत्व आहेत. अतिशय नावाजलेल्या व्यक्तीला आबांच्या नावाचा सामाजिक गौरव पुरस्कार देण्याचं भाग्य मिळालं याचा आनंद असल्याचे ते म्हणाले. कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी प्रास्ताविक केले .संचालक दिलीप पिसाळ यांनी आभार मानले. कार्यक्रमाला ऊस उत्पादक शेतकरी सभासद कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.