अंगापूर वंदन येथील प्रेमी युगुलाने आत्महत्या केल्या प्रकरणाचे पडसाद अंगापूर वंदन येथे उमटले. दोन नाभिक मंडळींची खोक्यातील दुकाने गावातील मंडळींनी पेटवली. यावर जाळपोळ प्रकरणात २७ जणांना पोलिसांनी अटक केली. गणेश चव्हाण, पांडुरंग चव्हाण यांच्यासह तिघांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी ही कारवाई केली. जाळपोळीत सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.