Maharashtra Political New Live Updates, 13 November 2025: राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केल्याप्रमाणे, यामध्ये पहिल्या टप्प्यात राज्यातील नगरपंचायती आणि नगरपरिषदेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी अर्ज दाखल करण्याचा आज चौथा दिवस आहे, तरीही राज्यातील अनेक ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाच्या मुद्द्यांवर मतभेद दिसून येत आहेत. याच पार्श्वभूमीवर, राज्यातील घडामोडींचा लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून आढावा घेऊया.
Mumbai Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रातील विविध घडामोडींचा लाईव्ह आढावा
मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी अभियंत्यांचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले
पुण्यातील नवले ब्रीज परिसरात दोन कंटेनरच्या मध्ये कार चेपून आग लागल्याने मोठी हानी झाल्याचे वृत्त अतिशय दुःखद आहे. ही घटना अतिशय दुःखद आणि दुर्दैवी आहे.या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरीकांना भावपूर्ण श्रद्धांजली. जखमींवर उपचार सुरू असून ते लवकर बरे होऊन घरी परत यावे ही ईश्वरचरणी प्रार्थना. दरम्यान या घटनेबाबत मी प्रशासनाच्या संपर्कात आहे, अशी पोस्ट सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
पुण्यातील नवले पुलावर झालेल्या भीषण अपघातात ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. अपघातानंतर दोन ट्रकना आग लागली होती. दरम्यान अग्निशमक दलाकडून ही आग विझवण्यात आली. ऐन संध्याकाळच्या वेळी झालेल्या अपघातामुळे मुंबई-बंगळुरू महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याची माहिती मिळत आहे.
राज्यातील १ कोटी ५० लाखांहून अधिक नागरिकांची मधुमेहासाठी तपासणी! २८ लाखांहून अधिक रुग्णांवर उपचार…
दहशतवादी प्रकरणानंतर मुंब्रा चर्चेत का येतो? काय आहे मुंब्रा शहराचा इतिहास…
"नंतर कशाला, आत्ताच आत्मदहन कर; मी तुला पेट्रोल आणून देतो", नायब तहसीलदाराची अरेरावी, शेतकरी उद्विग्न…
‘विचारा इस्लामविषयी’चे फलक, राजधानीतील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळेंनी मागितला अहवाल
विक्रोळीत विकासकामांमुळे धुळीची समस्या वाढली; सहाय्यक आयुक्तांना प्राणवायू सिलिंडर, मुखपट्टी देऊन निषेध
Vasai Virar Fire News: विरार पुलावर मॅजिक वाहनाला आग, वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचले विद्यार्थ्यांचे प्राण
कुष्ठरोग : जिल्ह्यात तीन लाख ७५ हजार ५१२ घरे, १९ लाख ५५ हजार ३८६ नागरिकांच्या तपासणीसाठी १,३७६ सर्वेक्षण पथके
डोंबिवलीतील ठाकरे गटाचे शहरप्रमुख, मनसे पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश, मनसेची डोंबिवलीतील तगडी फळी भाजपच्या वाटेवर
सीआरपीएफ उप महानिरीक्षकाच्या मुलीची आत्महत्या,एम्स पुन्हा हादरले
ठाणे महापालिका अधिकाऱ्यांना ‘स्मृतीदोष’, परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत आयुक्तांनी असं का म्हटलं?
भाजप आमदार बंटी भांगडिया यांना धक्का, समर्थकाचा कॉग्रेसमध्ये प्रवेश
TET 2025 : इतर राज्ये याचिका करत असताना महाराष्ट्राची टाळाटाळ का? शिक्षक संघटनांचा सवाल; आंदोलनाचा इशारा
"मदतीच्या नावावर केवळ शेतकऱ्यांची फसवणूक केली", रोहित पवार यांची सरकारवर टीका
आमदार रोहित पवार यांनी शेतकऱ्यांच्या मतदीवरून महायुती सरकारवर टीका केली आहे. एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये रोहित पवार म्हणाले की, "महायुती सरकारने मदतीच्या नावावर केवळ शेतकऱ्यांची फसवणूक केली हे आता हळूहळू समोर येत आहे. राज्यभरात ७० लाख हेक्टर पिकांचं नुकसान झालं, हजारो जनावरं दगावली, बळीराजा अक्षरश: कोलमडून पडला तरी सरकारच्या काळजाला सरसकट ₹५० हजार मदत करण्याचा पाझर फुटलेला नाही."
ते पुढे म्हणाले की, "हेक्टरी ५० हजार तर दिले नाहीतच, पण जी तुटपुंजी मदत दिली त्यात देखील बागायती अनुदानासाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांना कोरडवाहूप्रमाणे आणि कोरडवाहू शेतकऱ्यांना कुणाला ₹३ तर कुणाला ₹४ हजार अशी तुटपुंजी मदत देऊन तोंडाला पानं पुसण्याचं काम सुरू आहे. एकप्रकारे शेतकऱ्यांचा विश्वासघात या सरकारने केला असून राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये सरकारच्या या फसवणुकीबाबत संताप आहे. शिवाय अजूनही ना खरडून गेलेल्या जमिनीचे पैसे आले, ना जनावर दगावल्याचे पैसे मिळाले. सरकारने आता तरी अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांची चेष्टा करणं बंद करावं आणि त्यांना पुरेशी मदत द्यावी, ही विनंती!"
आमदार सुरेश धस समर्थक ‘खोक्या’ सुटणार !
नवरदेवासह आईच्या अपघाती मृत्यूस वाहन चालक जबाबदार; पोलिसांकडून गुन्हा दाखल....
लोणावळ्यात महायुती तुटण्याची शक्यता; माजी मंत्री बाळा भेगडेंचा शेळकेंच्या फॉर्म्युलाला विरोध
रेल्वेत आसनाच्या वादातून प्रवाशावर ‘कात्री’ने वार, प्रवास खरोखर सुरक्षित आहे का?
"हाच निर्णय लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत घेतला असता चित्र खूप वेगळे असते", रोहित पवारांची प्रतिक्रिया चर्चेत
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतून निवडणूक आयोगाने पिपाणी (ट्रम्पेट) हे चिन्ह वगळण्याचा निर्णय घेतला आहे. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे (शरद पवार) आमदार रोहित पवार म्हणाले की, "निवडणूक चिन्हातून पिपाणी (ट्रम्पेट) हे चिन्ह वगळल्याबद्दल निवडणूक आयोगाचे आभार..! लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत या पिपाणीचा खूप मोठा फटका आम्हाला सहन करावा लागला. हाच निर्णय लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत घेतला असता तर आजचं चित्र खूप वेगळं असतं...!
