Maharashtra News Highlights: मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीनंतर राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटियरबाबत एक शासन निर्णय जारी केला आहे. याला राज्यातील काही ओबीसी संघटनांनी विरोध केला आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाने देखील साखळी उपोषण सुरू केलं आहे. दरम्यान, ओबीसी विकास मंत्री अतुल सावे हे या आंदोलकांची आज भेट घेणार आहे. सावे यांच्यासमोर उपोषण सोडवण्याचं आवाहन आहे. तर, “मराठा समाजाला आमच्या ताटातून काहीही मिळालेलं नाही, आमचं ताट पूर्णपणे सुरक्षित आहे”, असं वक्तव्य ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी केलं आहे.

दरम्यान, उद्या (५ सप्टेंबर) बारामतीत लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली ओबीसींचा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. ‘ओबीसी आरक्षण बचाव’ ही मागणी घेऊन मोर्चा काढणार असल्याची माहिती स्वतः हाके यांनी दिली आहे. तर, “शासन निर्णयातील काही शब्दांवरून संभ्रम निर्माण झाला असून आम्ही कागदपत्रांची जुळवाजुळव करत आहोत. सोमवार किंवा मंगळवापर्यंत आम्ही न्यायालयात जाऊ”, असं छगन भुजबळ यांनी जाहीर केलं आहे. याचबरोबर त्यांनी ओबीसींना आंदोलन न करण्याचं आवाहन केलं आहे.

दुसऱ्या बाजूला, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र ओबीसी आरक्षण उपसमिती गठित करण्यात आली आहे. छगन भुजबळ, अतुल सावे, पंकजा मुंडे, गुलाबराव पाटील, संजय राठोड व दत्ता भरणे हे या उपसमितीचे सदस्य असतील.

Live Updates

Maharashtra Latest News Today: राज्य व देशातील सर्व महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक घडामोडी वाचा एकाच क्लिकवर.

18:32 (IST) 4 Sep 2025

"हा सरसकट आरक्षणाचा GR नाही", देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “छगन भुजबळ हे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतून कुठेही गेले नाहीत. त्यांची व माझी चर्चा झाली आहे. मी त्यांना आश्वस्त केलं आहे की आपल्या सरकारने जी अधिसूचना (जीआर) काढली आहे त्याने ओबीसी समाजावर कुठलाही परिणाम होणार नाही. कारण हा सरसकट जीआर नाही. हा केवळ पुराव्याचा जीआर आहे.”

18:31 (IST) 4 Sep 2025

"शिंदे हे फडणवीसांच्या गृह विभागाचे राजकीयदृष्ट्या कपडे काढतायत", 'त्या' पत्रावरून रोहित पवारांचा चिमटा

Rohit Pawar on Milind Deora : "दक्षिण मुंबईचा ७/१२ धनिकांच्या नावावर केलेला नाही", अशा शब्दांत संजय राऊतांनी मिलिंद देवरांच्या पत्रावर संताप व्यक्त केला. ...वाचा सविस्तर
17:54 (IST) 4 Sep 2025

शासनाच्या निर्णयाची ‘होळी’ चंद्रपुरात ओबीसी आक्रमक; नियमांचे उल्लंघन…

महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या घेतलेल्या निर्णयाविरोधात ओबीसी समाजाच्या वतीने आज दुपारी ३ वाजता,गांधी चौक येथे ओबीसी समाजाचा वतीने शासन निर्णयाची होळी करून जोरदार राज्य सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन केले. ...वाचा सविस्तर
17:41 (IST) 4 Sep 2025

वाशी एपीएमसीत पहिल्यांदाच न्यूझीलंडचे ‘रूज’ सफरचंद दाखल

भारतातील फळबाजार क्षेत्रात पहिल्यांच न्यूझीलंडमधून आणलेले प्रीमियम रूज प्रजातीचे सफरचंद दाखल झाले आहेत. ...अधिक वाचा
17:27 (IST) 4 Sep 2025

अकरावी प्रवेशाचा गोंधळ कायम! अमरावती विभागात ६३ हजारांहून अधिक जागा…

दहावीचा निकाल लागून साडेतीन महिन्यांचा कालावधी उलटला, तरी अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाची प्रक्रिया अजूनही पूर्ण झालेली नाही.अमरावती विभागात अकरावीच्या तब्बल ६३ हजार ४६९ जागा रिक्त असल्याचे चित्र आहे. ...सविस्तर बातमी
16:12 (IST) 4 Sep 2025

कामठीत मतचोरी ; कॉंग्रेसचा आरोप भाजपने फेटाळला, जिल्हा उपाध्यक्षांचा नवा दावा …

कामठी विधानसभा मतदारसंघातून मतचोरीचे आरोप गज्जू यादव यांनी फेटाळून लावले कामठी विधानसभा मतदारसंघात चार महिन्यांत ३५ हजार मतदार वाढले आणि मत चोरी केली, हा काँग्रेसचा आरोप चुकीचा आहे. ...अधिक वाचा
14:51 (IST) 4 Sep 2025

मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत शिंदे-फडणवीसांमध्ये मतभेद? दोघांची वेगवेगळी मतं

मुंबईतील मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनप्रकरणी नऊ गुन्हे दाखल झाले आहेत. मुंबईतील झोन एकच्या हद्दीतील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये मराठा आंदोलकांविरोधात नऊ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे गुन्हे मागे घेतले जावेत अशी मागणी मराठा आंदोलकांनी केली आहे. याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “आम्ही आंदोलन काळातील सर्व राजकीय गुन्हे मागे घेणार आहोत.”

दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत म्हणाले की "आत्ता मराठा आंदोलनादरम्यान जे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ते उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दाखल केले आहेत. त्यामुळे त्याच्यावर जो काही निर्णय घ्यायचा असेल तो उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणल्यानंतरच घ्यावा लागेल."

14:48 (IST) 4 Sep 2025

महाराष्ट्राच्या राजकारणामुळे ‘त्यांना’ मोठी संधी… ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांनी कोणाला दिला सल्ला?

सध्याचे राजकारण-समाजकारण यांचा वेध व्यंगचित्रकारांनी मोकळेपणाने घ्यायला हवा. आजूबाजूला घडणाऱ्या सगळ्या घटकांचा वापर करत व्यक्त व्हायला हवे,’ अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. ...वाचा सविस्तर
14:42 (IST) 4 Sep 2025

"…केवळ त्यांनाच लाभ मिळेल", फडणवीसांकडून सरकारच्या GR चं विश्लेषण; मराठा आरक्षणाबाबत म्हणाले…

Devendra Fadnavis on Hyderabad Gazetteer : देवेंद्र फडणवीस म्हणाले, "छगन भुजबळ हे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतून निघून गेले नाहीत. त्यांची व माझी चर्चा झाली आहे." ...सविस्तर वाचा
14:42 (IST) 4 Sep 2025

उत्तरमांड भरून वाहिले पण, प्रकल्पग्रस्तांची शिवारं कोरडीच

पाटण तालुक्यातील उत्तरमांड धरण भरून वाहिले आहे.या धरणासाठी जमिनी, घरदार सोडणाऱ्या प्रकल्पग्रस्तांची शिवारं मात्र, तहानलेली असून, हे प्रकल्पबाधित अन्यायाची भावना व्यक्त करीत आहे. ...सविस्तर बातमी
14:28 (IST) 4 Sep 2025

लवकरच वाढवण बंदर ते तवा प्रवास ३० मिनिटात; वरोर, वाढवण ते तवा द्रुतगती महामार्गासाठी अखेर निविदा प्रसिद्ध

२५७५.०८ कोटी रुपये खर्चाच्या या महामार्गाची निविदा प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करत महामार्गाच्या कामाला सुरुवात करण्याचे नियोजन एनएचएआयचे आहे. तर काम सुरु झाल्यापासून अडीच वर्षात काम पूर्ण करण्याचे उद्दिष्टही एनएचएआयचे आहे. ...सविस्तर बातमी
13:50 (IST) 4 Sep 2025

एकाच दिवशी तीन सोनसाखळ्या चोरी… १० लाखांचा ऐवज हिसकावून चोरटे फरार

नवी मुंबईत एकाच दिवशी दोन सोनसाखळी जबरी चोरीच्या घटना घडल्या आहेत.दोन्ही घटनेत मिळून १० लाखांच्या पेक्षा अधिक किमतीच्या तीन सोनसाखळ्या चोरी करण्यात आल्या आहेत. ...अधिक वाचा
13:35 (IST) 4 Sep 2025

"आरक्षण हे मुख्य उद्दीष्ट नव्हतं, त्यांना केवळ…", संजय राऊतांकडून मोठा संशय व्यक्त

Sanjay Raut on Eknath Shinde : शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत म्हणाले, "याआधी मनोज जरांगे यांच्याबरोबर नवी मुंबईतील वाशी येथे गुलाल उधळणारे (एकनाथ शिंदे) यावेळी राज्य सरकारच्या बैठकीला उपस्थित नव्हते." ...वाचा सविस्तर
13:19 (IST) 4 Sep 2025

"मोदींच्या कृपने भुजबळ मंत्रिमंडळात, अजित पवारांनी त्यांना…", संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

Sanjay Raut on Chhagan Bhujbal : शिवसेनेचे (उबाठा) खासदार संजय राऊत म्हणाले, छगन भुजबळ हे ओबीसी असल्याने पंतप्रधान मोदी यांनी त्यांना मंत्री केलं. ...अधिक वाचा
13:02 (IST) 4 Sep 2025

सावरकर सदनला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्याचे प्रकरण; नव्याने शिफारशीचा प्रस्ताव पाठविण्यासाठी महापालिकेला मुदतवाढ

सावरकर सदनची इमारत धोकादायक स्थितीत असून इमारतीतील रहिवाशांनी पुनर्विकासाला सहमती दिली आहे. त्यामुळे आपल्यालाही याचिकेत बाजू मांडण्याची संधी द्यावी, अशी मागणी विकासकाच्या वतीने वकील श्रीनिवास पटवर्धन यांनी केली. ...वाचा सविस्तर
13:02 (IST) 4 Sep 2025

"एका जीआरने मराठ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत", एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले, "कायदेशीर अडचणी…"

Eknath Shinde on Government Resolution : एकनाथ शिंदे म्हणाले, "राज्य सरकारने अवघ्या अर्ध्या तासात शासन निर्णय लागू केला असला तरी त्यावर आमचे तज्ज्ञ चार दिवस काम करत होते." ...सविस्तर वाचा
13:02 (IST) 4 Sep 2025

पनवेलमध्ये खूनातील आरोपीकडून पोलिसांवर कु-हाडीने हल्ला; दोन पोलीस जखमी

कारागृहातून जामीनावर सुटलेल्या खूनातील आरोपीने कु-हाड व कोयत्याचा वापर करून पोलिसांवर हल्ला केल्याने या झटापटीत दोन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले. ...सविस्तर वाचा
12:44 (IST) 4 Sep 2025

मराठा आरक्षणाचे कारण देत वैभव खेडेकर यांचा भाजप पक्ष प्रवेश पुढे ढकला, रत्नागिरी जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधाण

वैभव खेडेकर यांनी भाजपात  पक्ष प्रवेश करण्याचे निश्चीत केल्यावर या पक्ष प्रवेशाची संपूर्ण जिल्ह्याला उत्सुकता होती. मात्र ऐनवेळी हा पक्ष प्रवेश थांबविण्यात आल्याने आता हा पक्ष प्रवेश होणार की नाही याबाबत ही साशंकता निर्माण झाली आहे. ...सविस्तर बातमी
12:23 (IST) 4 Sep 2025

एका दिवसात ३९४ प्रवाशांची धरपकड, २.९१ लाख रुपये दंड वसूल

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील आठ रेल्वे स्थानकांवर विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. बुधवारी एका दिवशी सुमारे ३९४ प्रवाशांना पकडून २ लाख ९१ हजार ६४० रुपये दंड वसूल करण्यात आला. ...सविस्तर वाचा
12:04 (IST) 4 Sep 2025

मराठा आंदोलन व सरकारच्या निर्णयप्रक्रियेपासून दूर का राहिलात? एकनाथ शिंदे म्हणाले...

एकनाथ शिंदे म्हणाले, "मी त्या सगळ्या आंदोलनात सहभागी कसा होऊ शकतो? परतुं, सरकारने ही जीआर काढला आहे त्यात मुख्यमंत्री, मी स्वतः, उपमुख्यमंत्री अजित पवार, आमची उपसमिती, कायदेशीर पथक असे सगळेजण यात सहभागी होती. सर्वांनी बसून, चर्चा करून निर्णय घेतले आणि जीआर काढला. असे निर्णय रस्त्यावर जाऊन आंदोलनात सहभागी होऊन घेता येत नाहीत."

11:28 (IST) 4 Sep 2025

SOLAR BLAST : दोन कामगारांनी पाय गमावले, स्पोटाचा आवाज १० कि.मी.पर्यंत

बुधवारीमध्यरात्रीनंतर नागपूर जिल्ह्यातील बाजारगाव येथील सोलर एक्सप्लोसिव कंपनीत भीषण स्फोट झाला. यात एका कामगाराचा मृत्यू झाला असून दोन कामगारांना त्यांचे पाय गमवावे लागले आहे. ...अधिक वाचा
11:12 (IST) 4 Sep 2025

.SOLAR BLAST : दोन कामगारांनी पाय गमावले, स्पोटाचा आवाज १० कि.मी.पर्यंत

बुधवारीमध्यरात्रीनंतर नागपूर जिल्ह्यातील बाजारगाव येथील सोलर एक्सप्लोसिव कंपनीत भीषण स्फोट झाला. यात एका कामगाराचा मृत्यू झाला असून दोन कामगारांना त्यांचे पाय गमवावे लागले आहे. ...सविस्तर वाचा
11:12 (IST) 4 Sep 2025

.SOLAR BLAST : दोन कामगारांनी पाय गमावले, स्पोटाचा आवाज १० कि.मी.पर्यंत

बुधवारीमध्यरात्रीनंतर नागपूर जिल्ह्यातील बाजारगाव येथील सोलर एक्सप्लोसिव कंपनीत भीषण स्फोट झाला. यात एका कामगाराचा मृत्यू झाला असून दोन कामगारांना त्यांचे पाय गमवावे लागले आहे. ...सविस्तर वाचा
11:01 (IST) 4 Sep 2025

“जरांगेनी माघार घेऊ नये असं मंत्रिमंडळातील काहींना वाटत होतं”, राऊतांचा रोख नेमका कोणाकडे?

संजय राऊत म्हणाले, "मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन चालू असताना राज्यात जाती-जातीत संघर्ष व्हावा, अशी काही घटकांची इच्छा होती. मुळात मनोज जरांगे यांनी माघार घेऊच नये असंही काहींना वाटत होतं. जरांगे यांच्या आंदोलनाद्वारे देवेंद्र फडणवीस यांचं सरकार अडचणीत यावं असं सरकारमधील काही लोकांना वाटत होतं.याआधी मनोज जरांगे यांच्याबरोबर नवी मुंबईतील वाशी येथे गुलाल उधळणारे (एकनाथ शिंदे) सरकारच्या बैठकीला उपस्थित नव्हते. मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी सरकारच्या अंतिम बैठकांमध्ये ते नव्हते. मुळात ते असायला हवे होते. जाणीवपूर्वक त्यांना बाजूला ठेवण्यात आलं, हे सगळं संशयास्पद आहे."

10:48 (IST) 4 Sep 2025

मुंबईतील 'अशा' निदर्शनांना प्रतिबंधित करण्यासाठी पावलं उचला : मिलिंद देवरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

"मुंबईतील मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे मुंबई जवळपास ठप्प झाली होती" असं म्हणत, अशा प्रकारच्या निदर्शनांना प्रतिबंधित करण्यासाठी आवश्यक ती पावलं उचलावी अशी मागणी शिवसेनेचे (शिंदे) नेते मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे.

10:42 (IST) 4 Sep 2025

पुसेसावळीतील 'अवयवदान प्रबोधनपर सजावट' चर्चेत; काशीद कुटुंबीयांचा जनजागृतीपर उपक्रम

अवयवदान, वैद्यकीय मदतीच्या योजनांची जनजागृती शासन व सामाजिक संस्थांकडून करण्यात येते. नुकताच शासनातर्फे अवयवदान जनजागृती पंधरवडाही संपन्न झाला. ...सविस्तर बातमी