Maharashtra News Updates, 26 August 2025 : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील येत्या २९ ऑगस्ट रोजी मुंबईत आंदोलन करणार आहेत. त्यासाठी ते उद्या (२७ ऑगस्ट) जालन्यातील आंतरवाली-सराटी येथून निघणार आहेत. त्यांनी सरकारला आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी दोन दिवसांचा वेळ दिला असून. यावेळी आरक्षण दिलं नाही तर सरकार उलथवून टाकू, असा इशारा देखील जरांगे यांनी दिला आहे. दरम्यान, यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “लोकशाही मार्गाने मुंबईत आंदोलन करा. परंतु, गणेशोत्सवात विघ्न आणू नका. छत्रपती शिवाजी महाराज सण-उत्सात खोडा घालणाऱ्यांचा निःपात करायचे.” या वक्तव्यासह फडणवीसांनी जरांगे यांना अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. यासंबंधीच्या बातम्यांचा आढावा आपण या लाइव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत.
गेवराई येथील राड्याप्रकरणी लक्ष्मण हाके यांच्यासह १४ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. हाके हे नंबर एकचे आरोपी असून पोलिसांनी सुमोटोनुसार ही कारवाई केली आहे. दुसऱ्या बाजूला भंडाऱ्यातही मोठी उलथापालथ चालू आहे. गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयार हे आता भंडारा जिल्ह्याचे नवे पालकमंत्री असतील. तर संजय सावकारे यांना या पदावरून हटवण्यात आलं आहे. भोयार यांच्याकडे वर्ध्यासह भंडाऱ्याची देखील अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. तर, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्री म्हणून वर्णी लागली आहे. भंडाऱ्यासह राज्यात घडणाऱ्या इतर राजकीय घडामोडींवर आपलं लक्ष असेल.
‘वनतारा’ची एसआयटी चौकशी होणार
कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. सर्वत्र उत्सवाची तयारी चालू आहे. यावरही आपलं लक्ष असेल. दुसऱ्या बाजूला रिलायन्स फाऊंडेशनतर्फे गुजरातच्या जामनगरमध्ये चालवल्या जाणाऱ्या ‘वनतारा’ प्रकल्पाची विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करण्याचे आदेश सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने दिले. वन्यजीव संरक्षण कायदा आणि देशविदेशातून वन्यप्राणी ताब्यात घेण्याच्या प्रकल्पाच्या विद्यमान प्रक्रियेबाबत चौकशी केली जाणार आहे. यासह देशभरात घडणाऱ्या घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत.
Mumbai Breaking News Live Update : राज्यासह देशभरातील राजकीय व सामाजिक घडामोडींचा आढावा एकाच क्लिकवर.
मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले जाणार की नाही? गृहविभागाचा महत्त्वाचा निर्णय
अंतरवाली सराटीत झालेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनावेळी तणाव निर्माण झाला होता. यावेळी पोलिसांनी २०० हून अधिक मराठा आंदोलकांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल केले होते. मनोज जरांगे पाटील यांनी हे गुन्हे मागे घेण्याची विनंती केली होती. यावर मंगळवारी मराठा उपसमितीच्या बैठकीत चर्चा झाली. परंतु, हे गुन्हे अत्यंत गंभीर असल्याने मागे घेण्यात अडचणी येत असल्याचं गृह विभागानं आपल्या अहवालात म्हटलं आहे. यावर काय मार्ग काढता येतो यावर उपसमिती विचार करत असल्याचं सांगण्यात आलं आहे.
ठाण्यात गणेशोत्सवात दिवसा अवजड वाहनांना बंदी; पोलीस आयुक्तांची अंमलबजावणीची अधिसूचना
‘‘गडचिरोलीतील दारूबंदी फसवी, समीक्षा व्हावी,” खुल्या चर्चासत्रातील सूर
Manoj Jarange Protest: मनोज जरांगेंना नवी मुंबईतच रोखणार ?
गुंतवणूकीवर जादा परताव्याचे अमीष दाखविणाऱ्या सराफाला ७ वर्ष सश्रम कारावास
देशात सर्वसमावेशक राजकीय नेतृत्वाची वानवा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांची टीका
पिंपरीत प्रारूप प्रभाग रचनेवर अवघ्या दोन हरकती; मतदान केंद्र निश्चितीसाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती
गणेश आगमन आणि विसर्जनाच्या दिवशी शहरात अवजड वाहनांना बंदी घालावी ! जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांचे यंत्रणेला आदेश
नागपुरात अधिकाऱ्यांच्या नियोजनशून्यतेमुळेच अपघात… ॲड. अक्षय समर्थ, डॉ. चंद्रशेखर मोहिते कारण सांगतांना म्हणाले…
अमरावती पोलिसांमार्फत यवतमाळतील वाहनधारकांना नोटीस, काय आहे प्रकरण?
" पैसे द्या, पैसे द्या… देवा भाऊ पैसे द्या.." कंत्राटदारांनी मागितली भीक … नागपुरात…
मनोज जरांगे मुंबईत धडकण्याआधीच सरकारकडून एक मागणी मान्य; मराठा आरक्षण उपसमितीचा मोठा निर्णय
मराठा आरक्षणासाठीच्या मंत्रिमंडळ उपसमितीने मंगळवारी (२६ ऑगस्ट) मोठा निर्णय घेतला आहे. उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांच्यी एक मागणी मान्य करण्यात आली आहे. हैदराबाद गॅझेटबाबत न्यायमूर्ती शिंदे समितीला मुदतवाढ देण्याची त्यांची मागणी होती. ही मागणी मान्य करण्यात आली असून या समितीला सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. मराठा आरक्षणासाठी आंदोलन करताना मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना सरकारी नोकरी देण्याबाबत जरांगे यांनी मागणी केली होती. पुढील तीन महिन्यांत उरलेल्या नऊ लोकांना नोकरी देण्यात येईल, असंही विखे पाटील यांनी स्पष्ट केलं.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फुलांच्या दरात दुप्पटीने वाढ; २०० रूपये दराने विकल्या जाणाऱ्या फुलांची ४०० रूपये दराने विक्री
डोंबिवलीत गणेशमूर्तीकार पळाला… गणेशभक्त, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पदाधिकाऱ्यांमध्ये संताप
ठाणे स्थानकाबाहेरील मंडपाने अडवली प्रवाशांची वाट
Manoj Jarange : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
Manoj Jarange : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
डोंबिवलीत आयरेगाव तलावा काठच्या बेकायदा चाळी, जोते भुईसपाट
ठाण्यात गणेशोत्सवात टंचाईची समस्या; नदी पात्रातील पाणी पातळी खाली गेल्याने पाणी उपसा कमी होतोय
कल्याण, डोंबिवलीत बाजारपेठांच्या गजबजाटात; शिळफाटा रस्त्यासह अंतर्गत रस्तेही कोंडले
Terminal 1 at Mumbai Airport: मुंबई विमानतळाचं टर्मिनल १ पाडलं जाणार, पण नवी मुंबई विमानतळामुळे मिळतेय मुदतवाढ, वाचा नेमकं काय आहे नियोजन!
अमरावतीच्या ' या ' मातीच्या गणपतीला ३७५ वर्षांची परंपरा…
हरितालिकेला सोने वधारले… जळगावमध्ये किती दर ?
"आझाद मैदानात आंदोलन करायचं असेल तर आधी..." उच्च न्यायालयाचे मनोज जरांगेंना निर्देश
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे – पाटील यांनी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मोर्चा आणण्याचे जाहीर केले आहे. मात्र, जरांगे यांना परवानगीशिवाय हे आंदोलन करता येणार नाही. तसेच, त्यांना परवानगी देण्यात आली तरी, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होण्याची, तसेच कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी त्यांना मुंबईऐवजी खारघर येथील जागेचा आंदोलनासाठी पर्याय द्यावा, असे आदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी राज्य सरकारला दिले.