वाढीव आरक्षणासाठी वंजारी समाजाचा मोर्चा
‘भगवानबाबा आमची भक्ती तर गोपीनाथ मुंडे आमची शक्ती’ यासह ‘एक वंजारी लाखाला भारी’ अशा घोषणा देत वंजारी समाजाचा मोर्चा बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. वंजारी समाजाला सध्याचे दोन टक्के आरक्षण अपुरे असून वाढीव दहा टक्के आरक्षण द्यावे, अशी मागणी मोच्रेकऱ्यांनी केली. जिल्हाभरातून आलेल्या समाजबांधवांनी एकीची वज्रमुठ आवळत आरक्षण नाही तर मतदान नाही, अशी भूमिका घेतली.
बीड येथे बुधवारी वाढीव आरक्षणासाठी वंजारी समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सुरू झालेला मोर्चा माळीवेस, सुभाष रस्ता, अण्णा भाऊ साठे चौक, शिवाजी चौक, नगर रस्ता माग्रे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. आमची लोकसंख्या जास्त आहे. अपुऱ्या आरक्षणामुळे समाजातील विद्यार्थी शिक्षणापासून तर उच्चशिक्षित युवक रोजगारापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे दहा टक्के वाढीव आरक्षण द्यावे. जातीनिहाय जनगणना करण्यात यावी. जिल्हास्तरावर वंजारी समाजाच्या मुलांसाठी शासकीय वसतिगृह उभारावे, सुशिक्षित बेरोजगारांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून द्यावे. वंजारी समाजाच्या विकासासाठी स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने महामंडळ स्थापन करण्यात यावे. मागासवर्गीय प्रवर्गातून उच्चतम गुणवत्ताधारक स्पर्धकांना खुल्या प्रवर्गामध्ये सर्वस्तरावरील शिक्षणाची व नोकरीची संधी पूर्ववत मिळावी या मागण्यांचे निवेदन विद्यार्थिनींनी निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर यांना दिले. आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून वंजारी समाजबांधवांनी प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले होते. एकच मिशन वंजारी आरक्षण, आता खूप झाले, आरक्षण नाही तर मतदान नाही. आम्हाला नोकरी हवी, हाती कोयता नको असे घोषवाक्य असलेले फलक महिला आणि विद्यíथनींच्या हातामध्ये होते. मोर्चातील प्रत्येक व्यक्तीच्या हातात फलक आणि भगवे झेंडे सर्वाचे लक्ष वेधून घेत होते. मोर्चाच्या अग्रभागी विद्यार्थिनी तर शेवटी विविध राजकीय, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी कार्यकत्रे आणि समन्वय समितीचे सदस्य होते. मोर्चात महिला आणि विद्यार्थिनींचा सहभाग लक्षणीय होता. आरक्षणाच्या मागणीसाठी वंजारी समाज प्रथमच हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरल्याचे चित्र शहरात पहायला मिळाले.
बीड जिल्ह्यात मुंडेंशिवाय गर्दी
बीड जिल्ह्यमध्ये वंजारी समाजाची संख्या मोठी आहे. येथील राजकारणावरही वंजारी समाजाने कायम प्रभाव टाकलेला आहे. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे हे समाजाचे नेते म्हणून राज्यभरात समोर आले. संत भगवानबाबानंतर समाजसंघटक म्हणून आजही वंजारी समाज गोपीनाथ मुंडे यांचेच नाव घेतो. त्या गोपीनाथ मुंडे यांच्या जिल्ह्यत मंत्री पंकजा मुंडे किंवा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे या दोघांपकी कोणाचाही थेट सहभाग नसतानाही वाढीव आरक्षणाच्या मागणीसाठी समन्वयकांनी केलेल्या आवाहनावर समाज रस्त्यावर उतरला. मुंडे आणि गर्दी हे समीकरण जिल्ह्यच्या अंगवळणी पडलेले असताना दोन्ही मुंडेंशिवाय जमलेली गर्दी चच्रेचा विषय ठरली आहे.