बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये एक काळ असा होता जेव्हा कलाकार स्टार होण्यापूर्वी त्यांची नावे बदलत असत. मग ते दिलीप कुमार, मधुबाला, जितेंद्र किंवा राजेश खन्ना असोत. हा फॉर्म्युला सर्व स्टार्ससाठी हिट ठरला. नंतर आलेल्या अनेक स्टार्सनीही हा ट्रेंड फॉलो केला आणि त्यांची नावे बदलली. या यादीत बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारचाही समावेश आहे. अक्षय कुमारचे खरं नाव राजीव भाटिया आहे. पण त्याने आपल्या नावात बदल केला होता.
हेही वाचा-भूमी पेडणेकरने गोव्यात सुरु केलं आलिशान KAIA रेस्टॉरंट, नावात दडलाय खास अर्थ
अक्षय कुमारचे नाव आधी राजीव हरी ओम भाटिया होते. मुंबईत आल्यावर त्याने येथे मार्शल आर्ट शिक्षकाची नोकरी केली. यानंतर त्याने मॉडलिंगही केले. दिग्दर्शक महेश भट्ट यांना त्यांच्या ‘आज’ चित्रपटातील एका दृश्यासाठी कराटे प्रशिक्षकाची गरज होती. ही भूमिका केवळ काही सेकंदांची होती. अक्षय कुमारने ही भूमिका स्वीकारली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरला, पण या चित्रपटाने राजीव भाटियाचे संपूर्ण आयुष्यच बदलून टाकले. ‘आज’च्या शूटिंगदरम्यानच त्याने आपले नाव बदलून अक्षय कुमार ठेवण्याचा निर्णय घेतला.
एका जुन्या मुलाखतीत, अक्षय कुमारने खुलासा केला की चित्रपटात त्याची ४.५ सेकंदाची भूमिका होती. चित्रपटात कुमार गौरवचा अभिनय तो पाहायचा. या चित्रपटात त्याचे नाव अक्षय कुमार होते. अक्षय कुमारला हे नाव इतकं आवडलं की एक दिवस त्याने कोर्टात जाऊन नाव बदललं. अक्षय म्हणाला मला फक्त जाऊन माझे नाव बदलायचे होते आणि मी वांद्रे पूर्व न्यायालयात जाऊन ते केले. माझ्याकडे पुरावा म्हणून सर्व प्रमाणपत्रे आहेत.”
हेही वाचा- सारा अली खानने खरेदी केलं नवं ऑफिस, किंमत ऐकून नेटकरी म्हणाले, “जगाला सांगते…”
अक्षय म्हणाला त्यानंतर मला चित्रपट मिळू लागले, शेवटी त्याने १९९१ मध्ये सौगंध या चित्रपटातून मुख्य भूमिकेत पदार्पण केले. १९९२ मध्ये ‘खिलाडी’ या सस्पेन्स फ्लिकने त्याला यश मिळाले. त्यामुळे त्याला खिलाडी कुमार हे नाव देखील मिळाले. अक्षय कुमारने लवकरच ‘दीदार’, ‘मोहरा’, ‘मैं खिलाडी तू अनारी’, ‘सुहाग’ आणि ‘खिलाडियों का खिलाडी’ यांसारख्या चित्रपटांद्वारे अॅक्शन हिरो म्हणून ओळख निर्माण केली, तेव्हापासून अक्षय कुमार हिट चित्रपट देत आहे.