Javed Akhtar On Pakistani Actors Wishing Death: प्रसिद्ध लेखक व गीतरचनाकार जावेद अख्तर हे अनेकदा त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. नुकतेच त्यांनी कंगना रणौत व त्यांच्यातील वादावर वक्तव्य केले. अनेकदा ते त्यांच्यावर टीका करताना दसतात.
एकदा जावेद अख्तर यांनी असे वक्तव्य केले होते. जर भारतातील कट्टरपंथीयांना पाकिस्तान व नरक यामधील एक निवडायचे असेल, तर ते नरकात जाणे पसंत करतील. जावेद अख्तर एकदा असेही म्हणाले होते की, जर तुम्ही कोणत्या एका बाजूला असाल, तर तुम्हाला एका बाजूनेच लोकांच्या शिव्या ऐकाव्या लागतात. पण, तुम्ही दोन्ही बाजूंना नसाल, तर लोक दोन्हीकडून तुम्हाला शिव्या देतात. तू नरकात जा, जिहादी तू पाकिस्तानमध्ये जा, अशा वाईट शब्दांत लोक माझ्याशी बोलतात. ते मला जिहादी म्हणतात.
माझ्या त्या वक्तव्यामुळे…
आता ‘लल्लनटॉप’ला दिलेल्या मुलाखतीत जावेद अख्तर यांनी पाकिस्तान व नरक यांमध्ये ते नरकात जाणे पसंत करतील असे ते म्हणाले होते. आता त्यांच्या या वक्तव्याबद्दल स्पष्टपणे बोलले आहेत. जावेद अख्तर म्हणाले, “माझ्या त्या वक्तव्यामुळे पाकिस्तानला खूप वाईट वाटले. पण, मी त्यांना सांगितले आहे की, तुम्ही मला अजिबात व्हिसा देऊ नका.” दिग्गज कवी फैज अहमद फैज यांच्या स्मरणार्थ आयोजिलेल्या कार्यक्रमात ते दोन वर्षांपूर्वी पाकिस्तानला गेले होते.
जावेद अख्तर यांच्या वक्तव्यावर इमरान अब्बास, मिशी खान, असीम महमूद या पाकिस्तानी कलाकारांनी टीका केली होती. असीम मेहमूद यांनी जावेद अख्तरांना मृत्यू यावा, असेही म्हटले होते. त्यावर जावेद अख्तर म्हणाले, “जर त्यांच्या प्रार्थनांचा काही परिणाम झाला असता, तर ते आता ज्या परिस्थितीत आहेत, त्या स्थितीत नसते.”
आज पाकिस्तानी कलाकारांना असे वाटते की, जर ते भारतात राहिले असते, तर ते भारतीय कलाकारांसारखेच समृद्ध झाले असते. त्यांनी पाकिस्तानी अभिनेत्री बुशरा अन्सारी यांचे उदाहरण दिले. बुशरा अन्सारी चांगली कलाकार आहे. जर ती भारतात असती तर आतापर्यंत जागतिक स्तरावर ओळख मिळाली असती. हे दु:ख त्यांच्याबरोबर राहते.
पहलगाम हल्ल्यानंतर जावेद अख्तर यांनी वक्तव्य केले होते. त्यानंतर बुशरा अन्सारीने अभिनेते नसिरुद्दीन शाह यांच्याइतकेच शांत राहण्याचा सल्ला दिला होता.
दरम्यान, पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यास परवानगी नाकारली पाहिजे, असे जावेद अख्तर यांनी म्हटले होते.