‘हेरा फेरी ३’ या चित्रपटातून बाबूराव म्हणून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे अभिनेते परेश रावल हे सध्या चांगलेच चर्चेत आहे. ‘हेरा फेरी’ या चित्रपटात बाबूराव गणपतराव आपटे उर्फ बाबू भैया यांच्या भूमिकेने त्यांनी सर्वांच्या हृदयात एक वेगळंच स्थान निर्माण केले. प्रियदर्शन दिग्दर्शित चित्रपटात त्यांच्याशिवाय अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी हे कलाकारदेखील होते. गेल्या काही दिवसांपासून परेश रावल हे हेरा फेरी ३ चित्रपटामुळे चांगलेच चर्चेत आहेत.
या चित्रपटाची घोषणा झाल्याच्या काही दिवसांनी परेश यांनी एक्झिट घेत असल्याची घोषणा केली. त्यानंतर अनेक कलाकार व चाहत्यांनी याबद्दलच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. अशातच परेश यानी नायक असूनही मला बाजूला करण्यात आल्याचं म्हटलं आहे. ‘रेडिफ’ वर चाहत्यांशी झालेल्या संभाषणादरम्यान त्यांनी हे सांगितलं. २००१ मध्ये परेश रावल यांना अनेकदा ‘सर्वोत्कृष्ट विनोदी कलाकार’ आणि ‘विनोदी भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता’ अशा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
आता यासंदर्भात एका नेटकऱ्याने परेश रावल यांना विचारले की, “अशा पुरस्कारांमुळे ते आनंदी आहेत का?” या प्रश्नाचं उत्तर देताना परेश यांनी असं म्हटलं, “मी चित्रपटाचा नायक होतो. पुरस्कारांमध्ये काहीही म्हटलं गेलं तरी मला फरक पडत नाही.’ अशाप्रकारे पुरस्कार सोहळ्यात परेश रावल यांनी बाजूला करण्यात आल्याचे संकेत दिले.
त्यानंतर एका चाहत्याने परेश यांना ‘सर’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट खलनायकाचा पुरस्कार मिळाल्यानंतर तुम्ही रागावला होता, मग सर्वोत्कृष्ट विनोदी कलाकाराचा पुरस्कार मिळाल्यानंतर तुम्ही आता आनंदी आहात का?’ असं विचारलं. यावर अभिनेत्याने उत्तर दिले, ‘सर’ चित्रपटात मी खलनायक नव्हतो. त्यात मी एक पात्र आहे; पण ‘हेरा फेरी’मध्ये मी एक नायक होतो… हा काय मूर्खपणा आहे?”
परेश रावल ‘हेरा फेरी’ चित्रपटाच्या दोन भागात दिसले. पण ते आता तिसऱ्या भागात दिसणार नसल्याच्या चर्चा आहेत. अभिनेत्याने चित्रपटाची रक्कम परत करत ‘हेरा फेरी ३’मध्ये काम करणार नसल्याचे सांगितले आहे. तर अक्षय कुमारने नुकतीच याबद्दल प्रतिक्रिया दिली. त्याने या चित्रपटाबद्दलचं प्रकरण न्यायालयात आहे, त्यामुळे याबद्दल जो काही निर्णय असेल तो न्यायालयच घेईल असं म्हटलं.