बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा अलिकडेच प्रदर्शित झालेला ‘भूल भुलैय्या २’ बॉक्स ऑफिसवर तुफान चालला. एककीडे बॉलिवूड चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल अपयशी ठरताना दिसत असताना कार्तिकचा चित्रपट मात्र यशस्वी ठरला. सध्या कार्तिक आर्यन त्याच्या आगामी चित्रपटांच्या तयारीमध्ये व्यग्र आहे. अशातच आता त्यानं नुकत्याच एका मुलाखतीत करण जोहरच्या एका व्यक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. विशेष म्हणजे कार्तिकने करणचं नाव न घेताच त्याला टोमणा मारला आहे.

‘बॉलिवूड हंगामा’ला दिलेल्या एका मुलाखतीत कार्तिक आर्यनने, “मी तर रॅपिड फायर राउंड असणाऱ्या शोमध्ये खूपच लोकप्रिय आहे.” असं वक्तव्य केलं. अर्थात कार्तिकने कोणाचं नाव घेतलं नाही. मात्र त्याच्या या वक्तव्यावरून तो करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ शोबद्दल बोलत असल्याचा अंदाज लावला जात आहे. ‘बॉलिवूड हंगामा’च्या रिपोर्टनुसार कार्तिक आर्यननं करण जोहरचा शो ‘कॉफी विथ करण ७’च्या त्या एपिसोडबद्दल बोलत होता. ज्यात रॅपिड फायर राउंडमध्ये सारा अली खान आणि जान्हवी कपूर यांनी कार्तिकचं नाव घेतलं होतं.

dharmarao baba Atram, vijay Wadettiwar, lok sabha election 2024
आत्राम – वडेट्टीवार यांच्यातील वाद चिघळला
wardha lok sabha constituency, Amar Kale, sharad pawar ncp, amra kale campaign, Faces Setback , Complaints of Financial Mismanagement, amar kale not spending money, finance in campaign,
वर्धा : ‘हवेत राहू नका ‘, अमर काळे यांना सहकाऱ्यांचा इशारा
500 Years Later Surya Grahan Collides With Rarest Chaturgrahi Yog
५०० वर्षांनी सूर्य ग्रहणाला अद्भुत दुर्मिळ योग; ८ एप्रिलपासून ‘या’ राशींच्या नशिबात अमाप श्रीमंती, नशीब चमकणार
lokmanas
लोकमानस: मौनामागचे रहस्य..

करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’च्या ७ व्या सीझनमध्ये कार्तिक आर्यनच्या नावाचा उल्लेख करण्यात आला होता. पहिल्या ३ एपिसोडमध्येच अनेकदा करणने कार्तिक आर्यनचं नाव घेतलं आहे. कार्तिक आणि करणमध्ये ‘दोस्ताना २’ चित्रपटामुळे नाराजी आहे. करणच्या शोमध्ये पहिल्या एपिसोडमध्ये अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांनी हजेरी लावली होती. दुसऱ्या एपिसोडमध्ये अभिनेत्री सारा अली खान आणि जान्हवी कपूर या दोघींनी धम्माल केला होती. तर तिसऱ्या एपिसोडमध्ये अक्षय कुमार आणि सामंथा रुथ प्रभू यांनी हजेरी लावली होती.

आणखी वाचा- Video : कार्तिक- करण यांच्यात पुन्हा ‘दोस्ताना’, मतभेद विसरून केली धम्माल मस्ती

दरम्यान कार्तिक आर्यनच्या कामाबद्दल बोलायचं तर तो सध्या ‘शहजादा’ या त्याच्या आगामी चित्रपटाचं शूटिंग करत आहे. रोहित धवन यांचं दिग्दर्शक असलेला हा चित्रपट २०२० मध्ये प्रदर्शित झालेल्या अल्लू अर्जुनच्या ‘अला वैकुंठपुरमुलू’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात तो अलाया एफसोबत दिसणार आहे. याशिवाय त्याच्याकडे शशांक घोषचा ‘फ्रेडी’ तसेच ‘सत्यनारायण की कथा’ आणि ‘कॅप्टन इंडिया’ हे चित्रपट आहेत.