एनडीटीव्ही’चे वरिष्ठ कार्यकारी संपादक, पत्रकार रवीश कुमार यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिल्यावर सध्या समाजमाध्यमात यावरून प्रतिक्रिया येत आहेत. अशातच मराठीतील प्रसिद्ध गीतकार, लेखक क्षितिज पटवर्धनने यावर पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या पोस्टने अनेकांचे लक्ष वेधले आहे.

क्षितिज पटवर्धन सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. चित्रपटसृष्टीतल्या कलाकारांचे, चित्रपटांचे तो नेहमीच कौतूक करत असतो. तसेच तो सामाजिक मुद्द्यांवर भाष्य करत असतो. पोस्टमध्ये त्याने असं लिहलं आहे, “रवीश कुमारची आवडणारी गोष्ट म्हणजे त्याचा सौम्य आणि लोभस प्रांजळपणा. आकांड तांडव रहित सत्य सांगण्याची हातोटी. सवंग लोकप्रियतेसाठी स्वतःची न सोडलेली मर्यादा, आक्रमक असूनही आक्रस्ताळी नसलेली मांडणी, त्यामुळेच noise वाढवणाऱ्या लोकांमध्ये तो कायम voice वाटत राहील!!” अशा शब्दात त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

bajrang dal creates chaos over conversion in religious event at mira road
मिरा रोड येथे धार्मिक कार्यक्रमावरून गोंधळ; धर्मांतर होत असल्याचा संशय
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
women raped in Bopdev Ghat Pune
Bopdev Ghat Crime : “तरुणाला बांधलं आणि त्यानंतर २१ वर्षांच्या तरुणीवर तिघांनी सामूहिक बलात्कार..”, पोलिसांनी सांगितला बोपदेव घाटातला घटनाक्रम
sri lanka president leftist leader anura kumara dissanayake
लेख : श्रीलंकेसाठी ‘ग्रीक’ धडे!
Indian Olympic Association President PT Ushashad issued a notice to the members sport news
कार्यकाळ संपल्याची नोटीस, धमक्यांची पत्रे, अतिरिक्त खर्च आणि बरेच काही! ‘आयओए’ बैठकीत अनेक वादग्रस्त मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित
What Raj Thackeray Said?
Raj Thackeray : “शिवसेनेतल्या राजकारणाला कंटाळून मी…”, राज ठाकरेंनी सांगितला २४ वर्षांपूर्वीचा किस्सा
tirupati temple animal fat in laddoos row
चंद्राबाबू नायडूंच्या आरोपानंतरही तिरुपती मंदिरातील लाडूच्या विक्रीवर परिणाम नाही; गेल्या चार दिवसांत विकले गेले तब्बल ‘इतके’ लाडू
Gadchiroli forest officer arrested for accepting 2 lakh bribe
गडचिरोलीत ६६ लाखांची अपसंपदा जमविणाऱ्या, पालघरच्या ‘आरएफओ’वर गुन्हा, पत्नीही आरोपी

रवीश कुमार हे गेल्या २६ वर्षांपासून एनडीटीव्हीशी संलग्न होते. १९९६ साली पहिल्यांदा ते एनडीटीव्हीच्या संपर्कात आले. तेव्हापासून त्यांनी आपली पत्रकारिता आणि वृत्तांकनाच्या माध्यमातून समाजाकडून मोठा पाठिंबा मिळवला. सामान्यांचे प्रश्न मांडण्याची त्यांची हातोटी विशेषत: तरुणांमध्ये प्रचंड चर्चेचा विषय ठरली होती. ‘रवीश की रिपोर्ट’ किंवा ‘प्राईम टाईम’ शोच्या माध्यमातून त्यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांना वाचा फोडली. मात्र, त्यांच्या राजीनाम्यामुळे माध्यम विश्वात चर्चा सुरू झाली आहे.