Aarya Jadhao Reacts on Her Elimination: बिग बॉस मराठीचे पाचवे पर्व आधीच्या सर्वच पर्वांपेक्षा खूप गाजत आहे. या पर्वातील स्पर्धकांची भांडणं, टास्कमध्ये होणारी झटापट याची सोशल मीडियावरही खूप चर्चा असते. बिग बॉस मराठीमध्ये मागच्या आठवड्यात झालेल्या कॅप्टन्सी टास्कची सर्वाधिक चर्चा झाली. या टास्कमध्ये रॅपर आर्या जाधवने निक्की तांबोळीच्या कानशिलात लगावली, त्यानंतर आर्याला बिग बॉसने निष्कासित केलं.

आर्या जाधव बिग बॉसच्या घराबाहेर पडली, त्याला एक आठवडा झाला आहे. आर्याने निक्कीला मारल्यावर तिला बिग बॉसने जेलमध्ये टाकलं होतं. त्यानंतर भाऊच्या धक्क्यात तिला घराबाहेर काढलं. निक्कीला मारणाऱ्या आर्याला प्रेक्षकांचा खूप पाठिंबा मिळत होता, आर्याने जे केलं ते बरोबर असल्याचं प्रेक्षक म्हणत होते, त्यामुळे आर्याला कदाचित काही दिवसांनी परत शोमध्ये आणतील अशी शक्यता होती, पण तसं काही घडलं नाही. याबद्दल आर्याला विचारण्यात आलं आहे, त्यावर तिने काय उत्तर दिलं ते जाणून घेऊयात.

हेही वाचा – Bigg Boss Marathi तील सर्वात खरा स्पर्धक कोण? आर्या जाधव ‘या’ सदस्याचे नाव घेत म्हणाली, “शोच्या सुरुवातीपासून…”

तुला परत शोमध्ये घेण्यासाठी चॅनलकडून संपर्क झाला का? असं आर्या जाधवला मुंबई तकच्या मुलाखतीत विचारण्यात आलं. त्यावर आर्या म्हणाली, “अजूनपर्यंत तर नाही.” त्यांनी संपर्क करायला पाहिजे असं वाटतं का? असं विचारल्यावर आर्या म्हणाली, “त्यावेळी माझी डिग्निटी घेऊन मी शोमधून निघाले. पण प्रेक्षक आणि संपूर्ण महाराष्ट्राला असं वाटतंय की मी शोमध्ये जायला पाहिजे. वाईल्ड कार्ड म्हणून जायला पाहिजे, कारण त्यांना माझा गेम पाहायचा आहे. जर प्रेक्षकांना माझा गेम बघायचा आहे, तर मला तो दाखवायला आवडेल. मलाही प्रेक्षकांसाठी बिग बॉस मराठीमध्ये परत जायला आवडेल.”

हेही वाचा – तुझ्यासाठी Bigg Boss Marathi तील टॉप ५ सदस्य कोण? आर्या जाधवने घेतली फक्त ‘ही’ चार नावं, म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बिग बॉस मराठीबद्दल आता बऱ्याच चर्चा होत आहे. पाचवे पर्व १०० दिवस नव्हे तर अवघ्या ७० दिवसात प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं म्हटलं जात आहे. बिग बॉसच्या घरात नुकतीच पत्रकार परिषद झाली, ती पाहूनही नेटकरी हा शो संपणार आहे, अशात कमेंट करत आहेत.