राखी सावंतने पती आदिल खानविरोधात मारहाणी व फसवणुकीचे आरोप केले आहेत. त्यानंतर आदिल खान पोलीस कोठडीत आहे. आज पुन्हा त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी आदिलला जामीन मिळू नये, यासाठी राखी प्रयत्न करत आहे. तसेच आदिलविरोधात म्हैसूरमध्येही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यासंदर्भात राखी सावंतने भाष्य केलं आहे.
साजिद खान Bigg Boss 16 मधील ‘या’ अभिनेत्रीला करतोय डेट? नाव वाचून व्हाल चकित
राखी व तिच्या वकिलाने यावेळी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आदिलला न्यायालयीन कोठडी देण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच आदिलला चौकशीसाठी म्हैसूरला नेण्याची परवानगी द्यावी, म्हणून पोलिसांनी अर्ज केल्याचंही सांगितलं. न्यायाधिश म्हैसूर पोलिसांना आदिलची कस्टडी देतात की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरेल, अशी माहितीही त्यांनी दिली.
Video: आधी तक्रार दिली अन् आता तुरुंगात राखी सावंतने घेतली पतीची भेट; म्हणाली, “आदिल माझ्याशी खूप…”
दरम्यान, आदिलची कस्टडी म्हैसूर पोलिसांना दिल्यास तू काय करणार? असा प्रश्न राखीला विचारण्यात आला. त्यावर राखी म्हणाली, “म्हैसूरमध्ये त्याच्याविरोधात चार-पाच गुन्हे दाखल आहेत. तिथे त्याला नेल्यास चौकशीत किती वेळ लागेल याबद्दल कल्पना नाही, एक आठवडा किंवा एक महिनाही लागू शकतो. म्हैसूर पोलीस त्याचं काम करतीलच, पण त्याला जामीन मिळू नये, यासाठी आम्ही प्रयत्न करू. कारण, त्याच्याजवळ माझे दागिने, माझे व्हिडीओ आहेत. खरं तर पाणी आता डोक्यावरून गेलंय,” असं राखीने सांगितलं.
यावेळी राखी सावंतने आताची परिस्थिती तिच्यासाठी खूप भावनिक आणि गोंधळात टाकणारी असल्याचंही म्हटलं आहे.
म्हैसूरमधील प्रकरण काय?
राखी सावंतचा पती आदिल खानच्या विरोधात मैसूरमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. एका इराणी विद्यार्थिनीने वीवी पुरम पोलीस ठाण्यात कलम ३७६, ४१७, ४२०, ५०४ आणि ५०६ नुसार बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही इराणी विद्यार्थिनी डॉक्टर ऑफ फार्मसीचं शिक्षण घेण्यासाठी भारतात आली होती.