झी मराठीवरील एकत्र कुटुंब पद्धतीचं दर्शन घडवणारी मालिका म्हणून ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकेला ओळखले जाते. या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारी अदिती म्हणजेच अभिनेत्री अमृता पवार काही दिवसांपूर्वी विवाहबंधनात अडकली. अमृताने नील पाटीलसोबत लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. तिच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आता नुकतंच तिने तिच्या वडिलांसाठी एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.

अमृता पवार ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने तिच्या लग्नातील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला तिने खास कॅप्शन दिले आहे. तसेच तिने या पोस्टमधून वडिलांचे आभार मानले आहेत.

अमृता पवारची इन्स्टाग्राम पोस्ट

“मी आज खरं बोलणार आहे. लग्नासाठी मुलगा बघताना तुम्ही खरंतर मला गोंधळात टाकलं होतं. तुम्ही माझ्या नवऱ्याबद्दलच्या अपेक्षा खूप वाढवून ठेवल्या होत्या. पण आता लग्न झाल्यावर मला त्या गोष्टीसाठी तुमचे आभार मानायचे आहेत.

मी आतापर्यंत केलेल्या प्रत्येक गोष्टीत तुम्ही मला पाठिंबा आणि आत्मविश्वास दिला. तुम्ही आणि आईने मला खूप पूर्वी वचन दिले होते की तुम्ही मला कोणतीही गोष्ट करण्यासाठी कधीही अडवणार नाही. आज त्यामुळेच मी इथर्यंत पोहचू शकली आहे. मला तुमच्यासारखे आई-वडील मिळाले यासाठी मी खरोखरच स्वत:ला भाग्यवान समजते. मी खूप कृतज्ञ आहे.

मी जेव्हा कधी चुकले तेव्हा प्रत्येकवेळी तुम्ही मला माझी चूक दाखवून दिली आणि मला त्यातून योग्य रस्ताही दाखवलात. मला तुम्ही उभं राहण्यासाठी ताकद दिलीत. जगाला काय वाटतं याचा विचार सोडून मला जे करावसं वाटत ते करण्याची हिंमत तुम्ही मला दिलीत. तू मला कधीच झुलवत ठेवलं नाहीस. तू मला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवलंस. इतर कोण काय बोलतंय आणि काय करतंय याची काळजी तुम्हाला कधीही करावी वाटली नाही. तुम्ही आजपर्यंत माझ्यासाठी जे काही केलंत त्यासाठी थँक यू बाबा. मी तुमच्यावर किती प्रेम करते ते मी शब्दात व्यक्त करू शकत नाही”, असे अमृता पवार म्हणाली.

अमृताच्या या भावूक करणाऱ्या पोस्टवर कलाकारांनी चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्स तिला वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

पाहा व्हिडीओ –

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ ही अमृताची मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्या जागी ‘नवा गडी, नवं राज्य’ ही मालिका सुरू होणार आहे.